शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जोगाईवाडी ग्रा.पं.चे चार सदस्य अपात्र; खर्च सादर न करणे अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:05 IST

अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी/चतुरवाडी येथील ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. सोबतच, या चारही सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ०१ जून रोजी दिले.

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी/चतुरवाडी येथील ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. सोबतच, या चारही सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ०१ जून रोजी दिले.

शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा व मदन परदेशी यांनी आपले पॅनल उभा केले होते. शहरापासून जवळच व जास्त उत्पन्नाची ग्रामपंचायत असल्याने या निवडणूकीत चांगलीच रंगत आली होती. परंतु मोदी - मुंदडा यांच्यावर मात करीत परदेशी यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे. निवडणूकीस उभा राहीलेल्या सदस्यांनी निवडणूक खर्च वेळेच्या आत दाखल करणे बंधनकारक असते. खर्च सादर न करणाºया उमेदवारांवर अपात्रतेची कार्यवाही होऊ शकते.

याठिकाणी निवडून आलेल्या माया अमोल साखरे, छाया माणिक खांडेकर, अमोल रामकृष्ण पवार, अमोल किशनराव विडेकर या चार सदस्यांनी आपला निवडणूक खर्च विहीत वेळेत सादर केला नव्हता. ग्रामपंचायत कलम १४ (अ) (ब) अधिनियम १९९८ चा भंग केल्याने या निवडून आलेल्या सदस्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांचा विरोधात उभा राहिलेले तस्लीम अजीत शेख, अनिता सुर्यकांत घाडगे, दत्ता भगवान बोडके, श्रीकांत नारायण जोशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. हे सदस्य मोठ्या प्रमाणात अपप्रचार व आर्थिक भष्ट्राचार करुन, मतदारांना पैशांचे प्रलोभन देवून अवैध पध्दतीने निवडून आलेले आहेत.

त्यामुळे ते निवडणूक खर्च सादर करु शकले नाहीत अथवा ते जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आलेले आहेत, असे तक्रारीत नमुद करण्यात आले होते. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांची चौकशी होऊन त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. याप्रकरणी तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. इस्माईल गवळी यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. इम्तियाज शेख आणि अ‍ॅड.प्रमोद शिंदे यांनी सहकार्य केले.

हिशोब देण्यात कसूर केल्याचा ठेवला ठपकाचार सदस्यांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने याची चौकशी उपजिल्हाधिकाºयांनी केली. सर्वांची बाजू ऐकून घेतली. चौकशीअंती माया अमोल साखरे, छाया माणिक खांडेकर, अमोल रामकृष्ण पवार, अमोल किशनराव विडेकर यांनी हिशोब देण्यात कसूर केल्याचे सिद्ध झाले. या कसुरी साठी त्यांच्याकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात येत असून पाच वर्षे ग्राम पंचायत निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालण्यात येत असल्याचे सिंह यांच्या आदेशात नमूद आहे.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडा