शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:08 IST

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : खरीप, दुष्काळ, टंचाई आढावा बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

बीड : दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नियमित कर्जभरणा करणाºया शेतक-यांच्या अनुदानाचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रविवारी येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगिता ठोंबरे, जि. प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषि विभागाने तयार केलेल्या भितीपत्रक, घडीपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये कपाशी वरील बोंडअळी नियंत्रण नियंत्रण, व्हाईट बग (खुमणीचे) नियंत्रण, तसेच शेतकºयांसाठी माहितीचे मोबाईल अ‍ॅपलॉन्च करण्यात आले.पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, नियोजन केलेल्या जास्तीत जास्त शेतक-यांना सौरपंप मिळावे म्हणून महावितरणने तात्काळ काम करावे. दुष्काळाच्या पाशभूमीवर शेतक-यांची वीज खंडीत केली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी शेतकºयांच्या बॅँकेविषयीच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व विभागांनी योग्य काम करुन शेतक-यांना दिलासा द्यावा, असे आ. सुरेश धस म्हणाले. आ. संगीता ठोंबरे यांनी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पीकविमा भरपाई मिळावी याकडे लक्ष वेधले. आ. देशमुख,आ. पवार, आ. धोंडे यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला.जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी पीक कर्ज व शेती अनुदान शेतक-यांना मिळावे यादृष्टीने जिल्हयातील बँकामार्फत कार्यवाही केली जाईल असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सोयाबीन क्षेत्रात साडेतीनशे टक्यांनी वाढ झाली असून कापूस क्षेत्र दीडशे टक्यांनी वाढत आहे.खरीप हंगामासाठी जिल्हयात ६०,००५ मे.टन खत पुरवठा होणार असून, कापूस बियाणे ७ लाख २२ हजार २५ पाकिटे प्रत्यक्ष पुरवठयासाठी उपलब्ध केले असल्याचे सांगण्यात आले.अनुदान मिळण्यात अडचण नाहीदुष्काळामुळे शेतक-यांना शासनाने कर्जमाफी दिलेली आहे. त्यामधील नियमित कर्ज भरणा-या खातेदार शेतक-यांना अनुदान मिळण्यात अडचण नाही.थकबाकी आणि दुष्काळामुळे अडचणीतील शेतकºयांना अनुदान मिळत नसल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी आदी दुष्काळी भागातील शेतकºयांना अनुदान रक्कमा मिळण्यासाठी योग्य ते निर्देश संबंधितांना दिले जावे यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये प्रयत्न करु असे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.आष्टी, पाटोदा, शिरुरसाठी अहमदनगर येथील पाणीपालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाणी टंचाई वरील उपाययोजनांचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या, आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील जनतेच्या पाण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात येतील.त्यासाठी विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागातील संबंधितांशी बोलून प्रश्न सोडवू.गेवराईसाठी विशेष उपाययोजनेस मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.आमदारांनी मांडले प्रश्नगेवराई येथील पाणीटंचाई वरील उपाय योजनांबाबत आमदार पवार यांनी प्रश्न मांडले.आष्टी पाटोदासाठी सीना प्रकल्पातून पाणी प्राप्त होत आहे. पण येथील पाणी अपुरे असल्याने कुकडीतून पाणी मिळावे अशी सूचना आ. धोंडे व आ. धस यांनी मांडली.इतर आमदारांनीही त्यांच्या मतदार संघातील परिस्थिती मांडली.जिल्हयातील पाणी प्रकल्पात १५८ दलघमी साठा शिल्लक असून उपयुक्त पाणी टक्केवारी ०.५६२ टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र