शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

चारा छावणीत घोटाळा; संस्थांची माहिती मागवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:12 IST

ज्या संस्थांनी २०१२-१३ साली चारा छावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांना छावणी देता येणार नाही. अशा संस्थांची माहिती राज्य शासनाने मागवल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खरीप हंगामात शासनाने दुष्कळ जाहीर केला आहे. त्याठिकाणी जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय व्हावी यासाठी छावण्या सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ज्या संस्थांनी २०१२-१३ साली चारा छावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांना छावणी देता येणार नाही. अशा संस्थांची माहिती राज्य शासनाने मागवल्या आहेत.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी हंगामात अनेक ठिकाणी पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे चारा व पाणीटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. राज्य शासनाच्या वतीने ज्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे त्या जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दुष्काळाच्या वेळी ज्या संस्थांनी छावण्या सुरु केल्या होत्या त्यापैकी अनेक संस्थांनी छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे समोर आले होते. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच या भ्रष्ट संस्थांकडून वसुली करण्याची देखील मागणी करण्यात आली होती. अशा सर्व गुन्हे दाखल झालेल्या संस्थांना छावण्या न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेल्या छावण्यांची संख्या ५४ आहे. त्यापैकी अनेक संस्था या राजकीय नेत्यांशी संबंधीत आहेत, त्याचसोबत एकाच संस्थेच्या उपशाखा असल्याचे दिसून येत आहे. तसेच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये छावण्या सुरु करण्यासाठी मागवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये देखील या वादग्रस्त ठरलेल्या संस्थांची चारा छावण्या घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. मात्र, राज्य शासनाने भ्रष्टाचार केलेल्या संस्थांना छावण्या न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे चारा छावणी माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ते पर्यायी मार्ग शोधत असल्याचे सूत्रांनी सांगितले.भ्रष्टाचार रोखण्यासाठी अटी व शर्तीयापूर्वी छावणी चालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा अनुभव राज्य शासनाच्या गाठीशी असल्यामुळे यावर्षी छावण्या देताना अनेक अटी व शर्ती घालण्यात आलण्यात आल्या आहेत. यामध्ये जनावरांची संख्या ३०० ते ५०० असलेल्या छावण्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पशुपालकास त्याची ५ पेक्षा अधिक जनावरे छावणीत दाखल करता येणार नाहीत. तसेच शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्ती मान्य असल्यावर छावणी चालकाला १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवर लिहून जिल्हाधिका-यांकडे देणे बंधनकारक आहे.

टॅग्स :droughtदुष्काळGovernmentसरकार