शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:11 IST

flood in Beed : नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला.

परळी : शहर व परिसरात   सोमवार पासून मुसळधार पाऊस सुरू झाला  असल्याने परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच वाण नदीला पूर आल्याने परळी तालुक्यातील वानटाकळी, दौनापूर, नागापूर, पांगरी ,संगम या गावातील नदी, नाले भरून वाहू लागली. या गावचा संपर्कही मंगळवारी पहाटेपासून तूटला होता. वाण टाकळी गावास पाण्याने वेढले होते.  परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर व संबंधित अधिकाऱ्यांनी वानटाकळी ला भेटून ग्रामस्थांना आधार दिला. तसेच राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला व शासनाने तातडीने मदत कार्य करण्याची मागणी केली आहे.

सोमवारी रात्री परळी ,अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला. दहा ही आखाड्यात ही पाणी घुसल्याने  वान टाकळी चे शेतकरी पहाटेच्यावेळी चिंचेच्या झाडावरच थांबले होते .पाणी कमी झाल्यानंतर झाडावरून  सकाळी खाली उतरले. नागापूरचे वान धरणही ओसंडून वाहत आहेत .नागापूर पुलावरून पाणी वाहिले नागपूर ते मांडेखेल  या मार्गावरील  संपर्क काही तास तुटला होता.

परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कनेरवाडी जवळील पुलाचे काम चालू असल्याने  पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही वेळ संपर्क तुटला होता त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. परळी अंबाजोगाईला जाण्यासाठी दुसरा मार्ग वाहनधारकांना वापरावा लागला.  परळी  -बीड राज्य रस्त्यावरील पांगरी पुलास ही पाणी लागले होते.. ओढ्यास वाण  नदीचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी उभी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे. ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले होत.. मंगळवारी पंकजा मुंडे तातडीने भरपावसात नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या. चिखल तुडवत त्यांनी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. 

वाण टाकळी जवळून वाण नदी वाहते. या नदीच्या पात्रा वरून पाणी वाहू लागल्याने हे पाणी वाणटाकळी गावात घुसले त्यामुळे वानटाकळी -दौनापूर चा संपर्क तुटला होता .वानटाकळी गावातील हनुमान मंदिर खंडोबा मंदिर ला पाण्याने वेढले होते.सोमवारी रात्री अकरा वाजता अचानक  गावात पाणी घुसले व मंगळवारी दुपारी 12 नंतर पाण्याची उंची कमी झाली. सोमवारी रात्री खंडोबा मंदिर मध्ये नेहमी प्रमाणे झोपण्यास गेलेले ग्रामस्थ ही मंदिरातच अडकून पडले होते वानटाकळी परिसरातील दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे अशी माहिती ग्रामस्थ तुकाराम मुंडे यांनी दिली.     परळी शहरात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.  ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने विनाविलंब मदत करावी अशी मागणी तळणी येथील शेतकरी संतोष मुंडे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :BeedबीडRainपाऊस