शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:11 IST

flood in Beed : नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला.

परळी : शहर व परिसरात   सोमवार पासून मुसळधार पाऊस सुरू झाला  असल्याने परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच वाण नदीला पूर आल्याने परळी तालुक्यातील वानटाकळी, दौनापूर, नागापूर, पांगरी ,संगम या गावातील नदी, नाले भरून वाहू लागली. या गावचा संपर्कही मंगळवारी पहाटेपासून तूटला होता. वाण टाकळी गावास पाण्याने वेढले होते.  परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर व संबंधित अधिकाऱ्यांनी वानटाकळी ला भेटून ग्रामस्थांना आधार दिला. तसेच राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला व शासनाने तातडीने मदत कार्य करण्याची मागणी केली आहे.

सोमवारी रात्री परळी ,अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला. दहा ही आखाड्यात ही पाणी घुसल्याने  वान टाकळी चे शेतकरी पहाटेच्यावेळी चिंचेच्या झाडावरच थांबले होते .पाणी कमी झाल्यानंतर झाडावरून  सकाळी खाली उतरले. नागापूरचे वान धरणही ओसंडून वाहत आहेत .नागापूर पुलावरून पाणी वाहिले नागपूर ते मांडेखेल  या मार्गावरील  संपर्क काही तास तुटला होता.

परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कनेरवाडी जवळील पुलाचे काम चालू असल्याने  पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही वेळ संपर्क तुटला होता त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. परळी अंबाजोगाईला जाण्यासाठी दुसरा मार्ग वाहनधारकांना वापरावा लागला.  परळी  -बीड राज्य रस्त्यावरील पांगरी पुलास ही पाणी लागले होते.. ओढ्यास वाण  नदीचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी उभी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे. ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले होत.. मंगळवारी पंकजा मुंडे तातडीने भरपावसात नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या. चिखल तुडवत त्यांनी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. 

वाण टाकळी जवळून वाण नदी वाहते. या नदीच्या पात्रा वरून पाणी वाहू लागल्याने हे पाणी वाणटाकळी गावात घुसले त्यामुळे वानटाकळी -दौनापूर चा संपर्क तुटला होता .वानटाकळी गावातील हनुमान मंदिर खंडोबा मंदिर ला पाण्याने वेढले होते.सोमवारी रात्री अकरा वाजता अचानक  गावात पाणी घुसले व मंगळवारी दुपारी 12 नंतर पाण्याची उंची कमी झाली. सोमवारी रात्री खंडोबा मंदिर मध्ये नेहमी प्रमाणे झोपण्यास गेलेले ग्रामस्थ ही मंदिरातच अडकून पडले होते वानटाकळी परिसरातील दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे अशी माहिती ग्रामस्थ तुकाराम मुंडे यांनी दिली.     परळी शहरात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.  ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने विनाविलंब मदत करावी अशी मागणी तळणी येथील शेतकरी संतोष मुंडे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :BeedबीडRainपाऊस