शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:11 IST

flood in Beed : नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला.

परळी : शहर व परिसरात   सोमवार पासून मुसळधार पाऊस सुरू झाला  असल्याने परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच वाण नदीला पूर आल्याने परळी तालुक्यातील वानटाकळी, दौनापूर, नागापूर, पांगरी ,संगम या गावातील नदी, नाले भरून वाहू लागली. या गावचा संपर्कही मंगळवारी पहाटेपासून तूटला होता. वाण टाकळी गावास पाण्याने वेढले होते.  परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर व संबंधित अधिकाऱ्यांनी वानटाकळी ला भेटून ग्रामस्थांना आधार दिला. तसेच राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला व शासनाने तातडीने मदत कार्य करण्याची मागणी केली आहे.

सोमवारी रात्री परळी ,अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या  वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला. दहा ही आखाड्यात ही पाणी घुसल्याने  वान टाकळी चे शेतकरी पहाटेच्यावेळी चिंचेच्या झाडावरच थांबले होते .पाणी कमी झाल्यानंतर झाडावरून  सकाळी खाली उतरले. नागापूरचे वान धरणही ओसंडून वाहत आहेत .नागापूर पुलावरून पाणी वाहिले नागपूर ते मांडेखेल  या मार्गावरील  संपर्क काही तास तुटला होता.

परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कनेरवाडी जवळील पुलाचे काम चालू असल्याने  पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही वेळ संपर्क तुटला होता त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. परळी अंबाजोगाईला जाण्यासाठी दुसरा मार्ग वाहनधारकांना वापरावा लागला.  परळी  -बीड राज्य रस्त्यावरील पांगरी पुलास ही पाणी लागले होते.. ओढ्यास वाण  नदीचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी उभी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे. ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले होत.. मंगळवारी पंकजा मुंडे तातडीने भरपावसात नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या. चिखल तुडवत त्यांनी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. 

वाण टाकळी जवळून वाण नदी वाहते. या नदीच्या पात्रा वरून पाणी वाहू लागल्याने हे पाणी वाणटाकळी गावात घुसले त्यामुळे वानटाकळी -दौनापूर चा संपर्क तुटला होता .वानटाकळी गावातील हनुमान मंदिर खंडोबा मंदिर ला पाण्याने वेढले होते.सोमवारी रात्री अकरा वाजता अचानक  गावात पाणी घुसले व मंगळवारी दुपारी 12 नंतर पाण्याची उंची कमी झाली. सोमवारी रात्री खंडोबा मंदिर मध्ये नेहमी प्रमाणे झोपण्यास गेलेले ग्रामस्थ ही मंदिरातच अडकून पडले होते वानटाकळी परिसरातील दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे अशी माहिती ग्रामस्थ तुकाराम मुंडे यांनी दिली.     परळी शहरात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.  ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने विनाविलंब मदत करावी अशी मागणी तळणी येथील शेतकरी संतोष मुंडे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :BeedबीडRainपाऊस