शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:15 IST

तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली.

ठळक मुद्दे५० ते ६० लाखांचे नुकसान : शेतकऱ्यांचे पशुधन वाचले; चारा जळून झाला खाक

माजलगाव/ गंगामसला : तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पशुधन वाचले, मात्र चारा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.डाके पिंपरी हे तालुक्यातील सधन गाव असून, गावाला गोदाकाठ लाभल्यामुळे शेतकरी देखील प्रगत आहेत. परंतु गावाला दृष्ट लागावी अशी घटना गुरुवारी दुपारी घडली. नदीच्या कडेला असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणातून आगीच्या ठिणग्या पडल्यामुळे अचानक आग लागली. ही बाब गावकºयांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले आणि गावकºयांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. गावकºयांनी कोठ्यांना आगी लागत असल्याने पशुधन सुरक्षित करुन घेतले. मात्र, गोठ्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजीला आगी लागत गेल्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या आगीत गोठ्यावरील शेती उपयोगी साहित्य ठिबक संच, ट्रॅक्टरचे साहित्य , पेरणी यंत्र, काढून ठेवलेल्या पाईपलाईन, मोटार आदीसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. तसेच गावासाठी असलेली पाण्याची टाकी व अडीच हजार कडबा असणाºया ९ ते १० गंजी जळून खाक झाल्या. यात शेतकºयांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुशील एकनाथ डाके, गोपाळ गंगाधर डाके , पांडुरंग मनोहर डाके, आसाराम तुकाराम डाके, प्रल्हाद शेषेराव डाके, भरत सूर्यकांत डाके, बळीराम भीमराव डाके, आश्रूबा भाऊराव डाके, सतीश दत्तात्रय डाके, गजेंद्र अच्युत डाके आदींसह अनेक शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले.आग विझविण्यासाठी गावकºयांनी शर्थीचे प्रयत्न केले. कोणी छोट्या विद्युत मोटारी चालू करून तर कोणी हाताने पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच माजलगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब देखील वेळेवर पोहोचला. परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. वृत्त लिहिपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. तर ती अजूनही फैलतच असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत होती.गावात वीजपुरवठा खंडित झाला असल्याने सद्य परिस्थितीला पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. महावितरणच्या संबंधित अधिकाºयांना फोन केला असता फोन घेण्याचीही तसदी अधिकारी घेत नाहीत. गावाची परिस्थिती भयावह झाली आहे. आम्हाला कोणी वाली आहे का नाही, असे सरपंच गणेश डाके म्हणाले.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणfireआग