शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:15 IST

तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली.

ठळक मुद्दे५० ते ६० लाखांचे नुकसान : शेतकऱ्यांचे पशुधन वाचले; चारा जळून झाला खाक

माजलगाव/ गंगामसला : तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पशुधन वाचले, मात्र चारा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.डाके पिंपरी हे तालुक्यातील सधन गाव असून, गावाला गोदाकाठ लाभल्यामुळे शेतकरी देखील प्रगत आहेत. परंतु गावाला दृष्ट लागावी अशी घटना गुरुवारी दुपारी घडली. नदीच्या कडेला असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणातून आगीच्या ठिणग्या पडल्यामुळे अचानक आग लागली. ही बाब गावकºयांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले आणि गावकºयांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. गावकºयांनी कोठ्यांना आगी लागत असल्याने पशुधन सुरक्षित करुन घेतले. मात्र, गोठ्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजीला आगी लागत गेल्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या आगीत गोठ्यावरील शेती उपयोगी साहित्य ठिबक संच, ट्रॅक्टरचे साहित्य , पेरणी यंत्र, काढून ठेवलेल्या पाईपलाईन, मोटार आदीसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. तसेच गावासाठी असलेली पाण्याची टाकी व अडीच हजार कडबा असणाºया ९ ते १० गंजी जळून खाक झाल्या. यात शेतकºयांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुशील एकनाथ डाके, गोपाळ गंगाधर डाके , पांडुरंग मनोहर डाके, आसाराम तुकाराम डाके, प्रल्हाद शेषेराव डाके, भरत सूर्यकांत डाके, बळीराम भीमराव डाके, आश्रूबा भाऊराव डाके, सतीश दत्तात्रय डाके, गजेंद्र अच्युत डाके आदींसह अनेक शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले.आग विझविण्यासाठी गावकºयांनी शर्थीचे प्रयत्न केले. कोणी छोट्या विद्युत मोटारी चालू करून तर कोणी हाताने पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच माजलगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब देखील वेळेवर पोहोचला. परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. वृत्त लिहिपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. तर ती अजूनही फैलतच असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत होती.गावात वीजपुरवठा खंडित झाला असल्याने सद्य परिस्थितीला पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. महावितरणच्या संबंधित अधिकाºयांना फोन केला असता फोन घेण्याचीही तसदी अधिकारी घेत नाहीत. गावाची परिस्थिती भयावह झाली आहे. आम्हाला कोणी वाली आहे का नाही, असे सरपंच गणेश डाके म्हणाले.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरणfireआग