शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'अखेर सांडवा फोडलाच'; ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासनाने २० टक्के पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:34 IST

धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला.

ठळक मुद्दे या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले.

धारूर ( बीड )  : पाच गावच्या ग्रामस्थांचा विरोध असताना रविवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सुरक्षितेचे कारण पुढे करत आरणवाडी येथील तलावाचा सांडवा फोडला. आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल १७ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. पहिल्याच वर्षी अधिकाऱ्यांनी सांडवा फोडून २० टक्के साठा कमी केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. 

धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला.  दरम्यान, या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले. त्यानंतार पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे झाले. तलावाचे सुरक्षितेचे कारण पुढे करत ८० ते ८५ % पाणी ठेवता येईल, असे निरीक्षण नोंदवून सुरक्षितेसाठी सांडवा फोडावाच लागेल अशी भुमिका घेतली. माञ, पाच गावच्या ग्रामस्थांनी यांला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, शनिवारी रात्री  पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता,  कार्यकारी अभियंत्यांनी अचानक पञ देऊन रविवारी सकाळी हा सांडवा फोडण्यास सुरूवात केली. 

अधिकार शाहीपुढे ग्रामस्थांची नरमाई हा सांडवा उभा दोन मिटर तर आडवा दहा फुट फोडण्यात येत असून अधिकारशाही पुढे ग्रामस्थाना हात टेकावे लागले. अधिकाऱ्यांचनी भीतीने कुठलेहि शासन पञक व नियम, निर्णय नसताना सांडवा फोडला असेल तर वरीष्ठ पातळीवरून यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

गाव आणि तलावाच्या सुरक्षेसाठी सांडवा फोडला आरांवादी साठवण तलावाचे काम यावर्षी पूर्ण झाले. या तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला. पहिले वर्ष असल्याने पाणीसाठा कमी असणे तलावाच्या सुरक्षितेसाठी आवश्यक होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणीनंतर तलावाखालील गावाची सुरक्षा लक्षात घेता हा सांडवा फोडणे आवश्यक होते. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सांडव्याचे काम पूर्ववत करण्यात येईल, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू.व्ही. वानखेडे यांनी सांगितले. 

सांडवा फोडणे दुर्दैवी तलावाचे काम याच वर्षी झालेले असून पाणीसाठा झालेला असताना सांडवा फोडावा लागणे, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना तो फोडल्यामुळे चौकशाची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.  

टॅग्स :BeedबीडWaterपाणीFarmerशेतकरी