शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'अखेर सांडवा फोडलाच'; ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासनाने २० टक्के पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:34 IST

धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला.

ठळक मुद्दे या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले.

धारूर ( बीड )  : पाच गावच्या ग्रामस्थांचा विरोध असताना रविवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सुरक्षितेचे कारण पुढे करत आरणवाडी येथील तलावाचा सांडवा फोडला. आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल १७ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. पहिल्याच वर्षी अधिकाऱ्यांनी सांडवा फोडून २० टक्के साठा कमी केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. 

धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला.  दरम्यान, या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले. त्यानंतार पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे झाले. तलावाचे सुरक्षितेचे कारण पुढे करत ८० ते ८५ % पाणी ठेवता येईल, असे निरीक्षण नोंदवून सुरक्षितेसाठी सांडवा फोडावाच लागेल अशी भुमिका घेतली. माञ, पाच गावच्या ग्रामस्थांनी यांला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, शनिवारी रात्री  पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता,  कार्यकारी अभियंत्यांनी अचानक पञ देऊन रविवारी सकाळी हा सांडवा फोडण्यास सुरूवात केली. 

अधिकार शाहीपुढे ग्रामस्थांची नरमाई हा सांडवा उभा दोन मिटर तर आडवा दहा फुट फोडण्यात येत असून अधिकारशाही पुढे ग्रामस्थाना हात टेकावे लागले. अधिकाऱ्यांचनी भीतीने कुठलेहि शासन पञक व नियम, निर्णय नसताना सांडवा फोडला असेल तर वरीष्ठ पातळीवरून यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

गाव आणि तलावाच्या सुरक्षेसाठी सांडवा फोडला आरांवादी साठवण तलावाचे काम यावर्षी पूर्ण झाले. या तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला. पहिले वर्ष असल्याने पाणीसाठा कमी असणे तलावाच्या सुरक्षितेसाठी आवश्यक होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणीनंतर तलावाखालील गावाची सुरक्षा लक्षात घेता हा सांडवा फोडणे आवश्यक होते. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सांडव्याचे काम पूर्ववत करण्यात येईल, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू.व्ही. वानखेडे यांनी सांगितले. 

सांडवा फोडणे दुर्दैवी तलावाचे काम याच वर्षी झालेले असून पाणीसाठा झालेला असताना सांडवा फोडावा लागणे, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना तो फोडल्यामुळे चौकशाची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.  

टॅग्स :BeedबीडWaterपाणीFarmerशेतकरी