शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लेकीच्या धाडसाने वाचले पित्याचे प्राण; दुचाकीवर १०० किमीचा प्रवास करीत पोहोचविले दवाखान्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 12:48 IST

औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करत अर्धांगवायू झालेल्या पित्यास वेळेवर उपचार मिळाल्याने वाचले प्राण

- रवींद्र अमृतकर नागद ( औरंगाबाद ) : शेतकरी असलेल्या पित्याला अचानक अर्धांगवायूचा झटका आला. मात्र धाडसी आरतीने घाबरुन न जाता मोटरसायकलवर पित्याला मध्ये बसवून आईला पाठिमागून घट्ट पकडायला लावले. औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करीत १०० कि.मी. अंतरावर असलेल्या औरंगाबादमधील रुग्णालयात वेळेवर पोहोचविले. यामुळे वडिलांचे प्राण वाचले असून आरतीच्या या धाडसाचे गावासह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

नागदपासून जवळ असलेल्या जामडी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी असलेले संजय परदेशी यांना दोन मुली असून मुलगा नाही. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. यामुळे घरात आता संजय परदेशी त्यांची पत्नी व मुलगी आरती हे तिघेच राहतात. आरती ही राष्ट्रीय उच्च माध्य. विद्यालयात बारावीत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी संजय परदेशी यांना अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे त्यांची पत्नी व आरती हे काळजीत पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असल्याने तसेच वाहनाची व्यवस्था नसल्याने आरतीने मोटरसायकलवर वडिलांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तातडीने वडिलांना मोटारसायकलवर मध्ये बसवून पाठिमागे आईला त्यांना घट्ट धरुन बसण्यास सांगितले. आणि औरंगाबादकडे प्रवास सुरु केला. 

जामडीपासून औरंगाबादचे अंतर हे शंभर कि.मी. असल्याने आजारी वडिलांसह ट्रिपल सीट प्रवास सोपा नव्हता, त्यात रस्तेही खराब मात्र आरतीने हिंमत न हारता औरंगाबाद गाठले. येथील एका खाजगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने वडिलांचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरतीने दाखविलेल्या या धाडसाबद्दल तिचे गावातून कौतुक केले जात आहे. यानिमित्त राष्ट्रीय विद्यालयात आरतीचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अर्जुन नितीन पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बी.एस. साळवे, बी.टी. जगताप, पी.एन. पवार, शेखर पाटील, प्रशांत पाटील, चव्हाण, गायकवाड, दीप्ती पाटील आदींची उपस्थिती होती.

रस्त्यात आठ कि.मी.चा औट्रम घाटआरती व तिच्या आईने आजारी वडिलांना मोटारसायकलवर बसवून प्रवास सुरू केला. तेव्हा वाटेतच संजय परदेशी यांची प्रकृती आणखी खराब झाली. तेव्हा आरतीने आईला त्यांना घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. त्यातच वाटेत अत्यंत खडतर व आठ कि.मी. अंतर असलेला नागद घाटातील ट्रिपल सीट प्रवास अत्यंत धोकादायक होता. तरीही न डगमगता आरतीने वडिलांना सुखरुप रुग्णालयात पोहोचविले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीय