शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

मावेजासाठी शेतकऱ्यांचे टोल नाक्यावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST

अंबाजोगाई : रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नसताना टोल वसुली मात्र सुरु ...

अंबाजोगाई : रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नसताना टोल वसुली मात्र सुरु करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सेलू अंबा येथील टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. आधी मावेजा द्या, नंतरच टोल वसुली करा अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.‌ माधव जाधव यांनी केली.

मावेजाची जवळपास ४५ कोटींची रक्कम प्रलंबित असताना आणि उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असतानाही टोल वसुली मात्र घाईने सुरु करण्यात आली. त्यामुळे सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी ॲड.‌ माधव जाधव यांच्या समवेत टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. यावेळी माकपचे कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.या आंदोलनात जगन्नाथ बरुरे, प्रवीण वाघमारे, ईश्वर शिंदे, महेश किर्दंत, रमेश कुडके, बंकट लोमटे, इंद्रजीत जाधव, उमेश देशमुख, प्रदीप लोमटे, धनराज कोळगीरे, सिराजखान पठाण, बालाजी लाड, दत्तात्रय गंगणे, शैलजा औताडे, अ.भा.किसान काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, सतीश भगत, महादेव वाघमारे, सुमतीबाई औताडे, संभाजी वाळवटे , निलेश देशमुख, सतीश भांडे आदींनी सहभाग घेतला.

तहसीलदारांना निवेदन

मावेजाच्या मागणीसह रस्ता आणि पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसूल करू नये, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी द्यावी, सायगाव, सेलू अंबा येथे सर्व्हिस रोड द्यावा या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गणेश सरोदे यांना देण्यात आले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजाभाऊ औताडे यांनी टोल नाक्याच्या पाच किमी परिघातील सर्व वाहनांना टोल माफी देण्याची मागणी केली.

कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

रेणापूर ते लोखंडी सावरगाव या ५४८-ब क्रमांकाच्या महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. परंतु, वाघाळा येथील ३५, सेलू आंबाच्या ११ आणि अंबाजोगाई ग्रामीणमधील १३ अशा एकूण ६९ शेतकऱ्यांना तीन वर्षे उलटूनही अद्याप मावेजा मिळालेला नाही. अंबा साखर कारखान्यालाही मावेजा दिला. मात्र गरजवंत शेतकऱ्यांचा मावेजा देताना कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या

आधी शेतकऱ्यांना मावेजाची रक्कम द्या, रस्त्याचे आणि पुलाचे काम पूर्ण करा आणि नंतरच टोल वसुली करा. गुत्तेदाराचे हित जोपासण्याआधी मावेजापासून वंचित शेतकऱ्यांच्या अडचणीही प्रशासनाने समजून घ्याव्यात.

- ॲड.‌ माधव जाधव, मराठवाडा अध्यक्ष, अखिल भारतीय किसान काँग्रेस