शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून फरपट तरीही मिळेना गारपिटीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:22 IST

दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना ६८ कोटी १५ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाला या अनुदानाचा अद्यापही विसर पडला असून ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना ६८ कोटी १५ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाला या अनुदानाचा अद्यापही विसर पडला असून ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

२०१६ मध्ये नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख होता. अशा परिस्थितीमध्ये अस्मानी संकटाला देखील शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. यामुळे शेतकºयांनी मोठ्या कष्टातून पिकवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटातून काही प्रमाणात बाहेर पडण्यासाठी शेतकºयांना शासकीय अनुदान देण्याची मागणी सर्वस्तरातून झाली होती. झालेल्या गारपिटीत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १७ शेतकरी बाधीत झाले होते. राज्यभरातून मदतीची मागणी करण्यात ओल्याने शासनाने निर्णय घेतला.

अतिवृष्टी व गारपिटीची भरपाई देण्याचा निर्णय ६ एप्रिल २०१६ रोजी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. यानुसार जिल्हा प्रशासनाला शेतकºयाच्या बाधीत शेताचे पंचनामे करू न किती नुकसान झाले, याची माहिती घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तसेच झालेल्या नुकसानाची खातरजमा करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शेतकºयांच्या बँक खात्यावर नुकसानीची मदत जमा करण्याचे आदेश देखील दिले होते.

या सर्व शेतकºयांना शासकीय मदत जाहीर होऊन देखील अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संतापाची लाट आहे. गारपीट मदतीच्या नावाखाली राज्य शासनाने नुसते कागदी घोडे नाचवले आहे. शेतकºयांना मदत करण्याची शासनाची मानसिकताच दिसत नाही. त्यामुळे शासनाने हातावर तुरी दिल्याची खोचक प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. गारपिटीची मदत लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.मदत तातडीने देण्याची मागणी१ लाख ७८ हजार १७ शेतकºयांचे गारपिटीमुळे झाले होते नुकसान जिल्ह्यात १ लाख ३२६ हेक्टरवरील क्षेत्र झाले होते गारपिटीमुळे बाधित २०१६ ची जाहीर झालेली मदत अद्याप न मिळाल्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा