शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून फरपट तरीही मिळेना गारपिटीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:22 IST

दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना ६८ कोटी १५ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाला या अनुदानाचा अद्यापही विसर पडला असून ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना ६८ कोटी १५ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाला या अनुदानाचा अद्यापही विसर पडला असून ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

२०१६ मध्ये नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख होता. अशा परिस्थितीमध्ये अस्मानी संकटाला देखील शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. यामुळे शेतकºयांनी मोठ्या कष्टातून पिकवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटातून काही प्रमाणात बाहेर पडण्यासाठी शेतकºयांना शासकीय अनुदान देण्याची मागणी सर्वस्तरातून झाली होती. झालेल्या गारपिटीत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १७ शेतकरी बाधीत झाले होते. राज्यभरातून मदतीची मागणी करण्यात ओल्याने शासनाने निर्णय घेतला.

अतिवृष्टी व गारपिटीची भरपाई देण्याचा निर्णय ६ एप्रिल २०१६ रोजी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. यानुसार जिल्हा प्रशासनाला शेतकºयाच्या बाधीत शेताचे पंचनामे करू न किती नुकसान झाले, याची माहिती घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तसेच झालेल्या नुकसानाची खातरजमा करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शेतकºयांच्या बँक खात्यावर नुकसानीची मदत जमा करण्याचे आदेश देखील दिले होते.

या सर्व शेतकºयांना शासकीय मदत जाहीर होऊन देखील अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संतापाची लाट आहे. गारपीट मदतीच्या नावाखाली राज्य शासनाने नुसते कागदी घोडे नाचवले आहे. शेतकºयांना मदत करण्याची शासनाची मानसिकताच दिसत नाही. त्यामुळे शासनाने हातावर तुरी दिल्याची खोचक प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. गारपिटीची मदत लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.मदत तातडीने देण्याची मागणी१ लाख ७८ हजार १७ शेतकºयांचे गारपिटीमुळे झाले होते नुकसान जिल्ह्यात १ लाख ३२६ हेक्टरवरील क्षेत्र झाले होते गारपिटीमुळे बाधित २०१६ ची जाहीर झालेली मदत अद्याप न मिळाल्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा