शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून फरपट तरीही मिळेना गारपिटीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:22 IST

दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना ६८ कोटी १५ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाला या अनुदानाचा अद्यापही विसर पडला असून ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना ६८ कोटी १५ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाला या अनुदानाचा अद्यापही विसर पडला असून ही मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

२०१६ मध्ये नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख होता. अशा परिस्थितीमध्ये अस्मानी संकटाला देखील शेतकºयांना सामोरे जावे लागले होते. यामुळे शेतकºयांनी मोठ्या कष्टातून पिकवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटातून काही प्रमाणात बाहेर पडण्यासाठी शेतकºयांना शासकीय अनुदान देण्याची मागणी सर्वस्तरातून झाली होती. झालेल्या गारपिटीत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १७ शेतकरी बाधीत झाले होते. राज्यभरातून मदतीची मागणी करण्यात ओल्याने शासनाने निर्णय घेतला.

अतिवृष्टी व गारपिटीची भरपाई देण्याचा निर्णय ६ एप्रिल २०१६ रोजी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. यानुसार जिल्हा प्रशासनाला शेतकºयाच्या बाधीत शेताचे पंचनामे करू न किती नुकसान झाले, याची माहिती घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तसेच झालेल्या नुकसानाची खातरजमा करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शेतकºयांच्या बँक खात्यावर नुकसानीची मदत जमा करण्याचे आदेश देखील दिले होते.

या सर्व शेतकºयांना शासकीय मदत जाहीर होऊन देखील अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संतापाची लाट आहे. गारपीट मदतीच्या नावाखाली राज्य शासनाने नुसते कागदी घोडे नाचवले आहे. शेतकºयांना मदत करण्याची शासनाची मानसिकताच दिसत नाही. त्यामुळे शासनाने हातावर तुरी दिल्याची खोचक प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. गारपिटीची मदत लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.मदत तातडीने देण्याची मागणी१ लाख ७८ हजार १७ शेतकºयांचे गारपिटीमुळे झाले होते नुकसान जिल्ह्यात १ लाख ३२६ हेक्टरवरील क्षेत्र झाले होते गारपिटीमुळे बाधित २०१६ ची जाहीर झालेली मदत अद्याप न मिळाल्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा