शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले; लॉकडाऊन काळात घरपोच भाजीपाला विक्रीतून कोटीची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:42 IST

एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

ठळक मुद्देचार तालुक्यांत 25 दिवसांत 184 शेतकरी गटाने केली दीड कोटींची उलाढाल

- पुरूषोत्तम करवा माजलगाव : लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळावा म्हणून शासनाने  घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फ त माजलगाव, धारुर, गेवराई, वडवणी या चार तालुक्यातील 184 शेतकरी गटाने 25 दिवसांत दीड कोटींचा भाजीपाला व फळे विक्री केले भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केल्याने लॉकडाऊनमध्ये योग्य भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनाही आर्थिक फायदा झाला.

कोरोनामुळे जिल्हाधिकार्‍यांनी विषम तारखेस सकाळी 7 ते 9.30 या वेळेत बाजारास परवानगी दिली होती. परंतु बाजारात खरेदी करण्यास होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने घरपोहोच भाजीपाला विक्री उपक्रम सुरू करुन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विक्री करण्याची परवानगी शेतकरी गटांना दिली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत 15 एप्रिलापासून या उपक्रमास सुरुवात झाली. माजलगाव, धारुर, वडवणी, गेवराई या चार तालुक्यात 184 शेतकरी गटांनी 10 मेपर्यंत म्हणजे 25 दिवसांत तब्बल दीड कोटींचा भाजीपाला विक्री केला. या उपक्रमामुळे भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता आल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फायदा झाला. एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. आडत, दलाल यांच्यामुळे होणारे नुकसान थेट भाजीपाला विक्री केल्याने भरुन निघाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान दिसत होते.

या गटाने केला भाजीपाला विक्रीमाजलगाव तालुक्यातील 50 शेतकरी गटाने 1 हजार 397 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 73 लाख रुपये व्यवसाय केला. गेवराई तालुक्यात 71 गटांनी 1 हजार 578 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 53 लाख रुपये, वडवणी तालुक्यात 11 गटांनी 243 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 5 लाख रुपये आणि धारुर तालुक्यात 52 गटांनी क्विंटल भाजीपाला विक्री करुन 425 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 10 लाख रुपये असा एकूण अंदाजे एक कोटी 42 लाखांचा व्यवसाय केला.

शेतमालाला योग्य भाव मिळाला घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रमामुळे ग्राहकांना थेट शेतकर्‍यांकडून ताजा व योग्य दरात भाजीपाला मिळाला. यामुळे ग्राहक समाधानी असून शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळाला. एवढेच नाही तर बाजारातील गर्दीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली. लॉकडाऊननंतरही हा उपक्रम चालू ठेवण्याचा मानस आहे.- सुरज मडके, उपविभागीय कृषी अधिकारी, माजलगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीBeedबीड