शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले; लॉकडाऊन काळात घरपोच भाजीपाला विक्रीतून कोटीची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:42 IST

एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

ठळक मुद्देचार तालुक्यांत 25 दिवसांत 184 शेतकरी गटाने केली दीड कोटींची उलाढाल

- पुरूषोत्तम करवा माजलगाव : लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळावा म्हणून शासनाने  घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फ त माजलगाव, धारुर, गेवराई, वडवणी या चार तालुक्यातील 184 शेतकरी गटाने 25 दिवसांत दीड कोटींचा भाजीपाला व फळे विक्री केले भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केल्याने लॉकडाऊनमध्ये योग्य भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनाही आर्थिक फायदा झाला.

कोरोनामुळे जिल्हाधिकार्‍यांनी विषम तारखेस सकाळी 7 ते 9.30 या वेळेत बाजारास परवानगी दिली होती. परंतु बाजारात खरेदी करण्यास होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने घरपोहोच भाजीपाला विक्री उपक्रम सुरू करुन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विक्री करण्याची परवानगी शेतकरी गटांना दिली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत 15 एप्रिलापासून या उपक्रमास सुरुवात झाली. माजलगाव, धारुर, वडवणी, गेवराई या चार तालुक्यात 184 शेतकरी गटांनी 10 मेपर्यंत म्हणजे 25 दिवसांत तब्बल दीड कोटींचा भाजीपाला विक्री केला. या उपक्रमामुळे भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता आल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फायदा झाला. एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान होत असताना शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात भाजीपाला विक्री करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. आडत, दलाल यांच्यामुळे होणारे नुकसान थेट भाजीपाला विक्री केल्याने भरुन निघाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान दिसत होते.

या गटाने केला भाजीपाला विक्रीमाजलगाव तालुक्यातील 50 शेतकरी गटाने 1 हजार 397 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 73 लाख रुपये व्यवसाय केला. गेवराई तालुक्यात 71 गटांनी 1 हजार 578 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 53 लाख रुपये, वडवणी तालुक्यात 11 गटांनी 243 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 5 लाख रुपये आणि धारुर तालुक्यात 52 गटांनी क्विंटल भाजीपाला विक्री करुन 425 क्विंटल भाजीपाला विक्री करुन 10 लाख रुपये असा एकूण अंदाजे एक कोटी 42 लाखांचा व्यवसाय केला.

शेतमालाला योग्य भाव मिळाला घरपोहोच फळे व भाजीपाला विक्री उपक्रमामुळे ग्राहकांना थेट शेतकर्‍यांकडून ताजा व योग्य दरात भाजीपाला मिळाला. यामुळे ग्राहक समाधानी असून शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळाला. एवढेच नाही तर बाजारातील गर्दीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली. लॉकडाऊननंतरही हा उपक्रम चालू ठेवण्याचा मानस आहे.- सुरज मडके, उपविभागीय कृषी अधिकारी, माजलगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीBeedबीड