शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दूध दर कोसळल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

अमर हजारे दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच ...

अमर हजारे

दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत आणि मशागतीचे भाव आकाशाला भिडले आहेत. कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी बी-बियाणे खरेदी करताना दिसत आहे.

महाराष्ट्रात टाळेबंदीच्या पूर्वी दुधाचे भाव समाधानकारक होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढविण्याचा निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. यामुळे अनेक शेतकरी पुन्हा दुधाचा धंदा करू लागले. परंतु, अचानक महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी लागू झाली आणि दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्य यांचे भाव मात्र तेजीत आहेत. दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा घेणेसुद्धा अवघड झाले आहे. दुधाच्या पगारातून पशुखाद्याची बरोबरीसुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे

यातच पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा हा चढ्या भावाने मिळतो आहे. उसाचा भाव प्रतिटन तीन हजार रुपये असल्याने एका मोळीला साधारण ६३ रुपये इतका खर्च येतो आहे. एका जनावरासाठी दोन मोळी हा हिशेब ठेवला तरी १२६ रुपये इतका खर्च होतो आणि खुराक आला साधारण पन्नास रुपये आणि तीच गाय दहा लिटर दूध देत असेल तर पंधरा, सोळा रुपये प्रतिलिटरने १६० रुपये होतात. अशी बिकट परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे.

जून महिना सुरू असल्याने आणि पाऊसही चांगला झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या मार्गावर आहे. परंतु, सोयाबीनचा एका पिशवीचा भाव ३१२५ रुपये असून, कांदा बी सुद्धा चांगलेच तेजीत आहे. जी परिस्थिती बियाण्यांच्या बाबतीत आहे, तीच शेती मशागतीची सुद्धा आहे. ट्रॅक्टरच्या पेरणीच्या भावात मोठा बदल झाला आहे. एक हजार रुपये असणारी पेरणी आता पंधराशेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ट्रॅक्टर नांगरट दोन हजारांपर्यंत, तर काकऱ्या पाळी १२०० रुपये इतक्या भावाने सुरू झाली आहे. डिझेल दरवाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. एकूणच काय तर बियाणे आणि ट्रॅक्टर मशागत वाढली असताना दुधाचा पडलेला भाव आणि गोधनाची मातीमोल किंमत ही शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतालचा फास झाला आहे . गोधन विकून पेरणी करावी की बायकोच्या मंगळसूत्रावर पेरणीसाठी हात घालावा या द्विधा मन:स्थितीत शेतकरी अडकला आहे

दुधाचे भाव पडल्याने आता मोठी पंचायत झाली आहे. घरात गोडेतेल घ्यावे की नाही हीच समस्या झाली आहे. यातच पुढे पेरणी उभी आहे. अशीच परिस्थिती चालू राहिल्यास व्याजाने पैसे घेऊन पेरणी करावी लागेल.

संदीप रामगुडे (शेतकरी)

दुधाचे भाव पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. यातच कांदा जाग्यावर सडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे , दिवसभर बाई शेतात काम करते तेव्हा एक तेलाची पिशवी येते, तर ट्रॅक्टरसाठी महिनाभर मजुरी करावी लागेल.

त्रिंबक जाधव (शेतकरी)