शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मदत जाहीर होऊनही शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:40 IST

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, अतिवृष्टीचे अनुदान रखडले : दुष्काळी परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच काळात बोंडअळीचे ८५ कोटी व अतिवृष्टीची ६८.१५ कोटी मदत निधी वर्ग होऊन महिना उलटूनही अनेक शेतकरी मदत निधीपासून वंचित आहेत.यावर्षी खरिपाच्या ७ लाख ८० हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली होती. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व बोंडअळीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच कापूस लागवडीचा खर्च देखील मिळाला नसल्यामुळे बोंडअळी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर शासनाने २५६ कोटी रुपये अनुदान जाहीर केले. परंतु अनुदान वाटपात प्रशासन व जिल्हा बँक अक्षम्य हलगर्जीपणा करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे रबीचा पेरा अवघा २० टक्के झाला आहे. या परिस्थितीत शेतकºयांना शासनाच्या वतीने बोंडअळीचे २५६ कोटी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच २०१६ मधील अतिवृष्टी बाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बोंडअळीची तिन्ही टप्प्यातील मदत वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मिळणारी मदत जाहीर होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, मदत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीfundsनिधी