शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मदत जाहीर होऊनही शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:40 IST

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, अतिवृष्टीचे अनुदान रखडले : दुष्काळी परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप व रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच काळात बोंडअळीचे ८५ कोटी व अतिवृष्टीची ६८.१५ कोटी मदत निधी वर्ग होऊन महिना उलटूनही अनेक शेतकरी मदत निधीपासून वंचित आहेत.यावर्षी खरिपाच्या ७ लाख ८० हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली होती. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व बोंडअळीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच कापूस लागवडीचा खर्च देखील मिळाला नसल्यामुळे बोंडअळी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर शासनाने २५६ कोटी रुपये अनुदान जाहीर केले. परंतु अनुदान वाटपात प्रशासन व जिल्हा बँक अक्षम्य हलगर्जीपणा करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे रबीचा पेरा अवघा २० टक्के झाला आहे. या परिस्थितीत शेतकºयांना शासनाच्या वतीने बोंडअळीचे २५६ कोटी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच २०१६ मधील अतिवृष्टी बाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र बोंडअळीची तिन्ही टप्प्यातील मदत वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मिळणारी मदत जाहीर होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, मदत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीfundsनिधी