शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

खतगव्हाणमध्ये शेतकऱ्यांचे चूलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:23 AM

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व ...

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी शासनाने ‘ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, पीकविमा मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी, तर केंद्र शासन व राज्य शासनाचे ८०० कोटी, असा ८६० कोटी रुपयांचा पीकविमा भरलेला असून, त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रुपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चूलबंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

-------

दोन दिंड्या एकत्र काढून आंदोलन

तुकाराम महाराजांची पालखी १ जुलै रोजी प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पात्रूड व कान्सूर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चूलबंद आंदोलन करत गावातून दिंडी काढत अनोखे आंदोलन करण्यात आले.

--------

शासन उदासीन

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचण असतानाही या शेतकरऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. कृषिदिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चूलबंद आंदोलन करावे लागत आहे.

-गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती

010721\purusttam karva_img-20210701-wa0026_14.jpg