शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
3
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
4
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
6
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
7
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
8
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
9
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
10
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
11
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
12
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
13
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
15
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

खतगव्हाणमध्ये शेतकऱ्यांचे चूलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व ...

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी शासनाने ‘ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, पीकविमा मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी, तर केंद्र शासन व राज्य शासनाचे ८०० कोटी, असा ८६० कोटी रुपयांचा पीकविमा भरलेला असून, त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रुपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चूलबंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

-------

दोन दिंड्या एकत्र काढून आंदोलन

तुकाराम महाराजांची पालखी १ जुलै रोजी प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पात्रूड व कान्सूर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चूलबंद आंदोलन करत गावातून दिंडी काढत अनोखे आंदोलन करण्यात आले.

--------

शासन उदासीन

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचण असतानाही या शेतकरऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. कृषिदिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चूलबंद आंदोलन करावे लागत आहे.

-गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती

010721\purusttam karva_img-20210701-wa0026_14.jpg