शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

खतगव्हाणमध्ये शेतकऱ्यांचे चूलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व ...

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी शासनाने ‘ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, पीकविमा मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी, तर केंद्र शासन व राज्य शासनाचे ८०० कोटी, असा ८६० कोटी रुपयांचा पीकविमा भरलेला असून, त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रुपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चूलबंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

-------

दोन दिंड्या एकत्र काढून आंदोलन

तुकाराम महाराजांची पालखी १ जुलै रोजी प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पात्रूड व कान्सूर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चूलबंद आंदोलन करत गावातून दिंडी काढत अनोखे आंदोलन करण्यात आले.

--------

शासन उदासीन

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचण असतानाही या शेतकरऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. कृषिदिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चूलबंद आंदोलन करावे लागत आहे.

-गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती

010721\purusttam karva_img-20210701-wa0026_14.jpg