शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
4
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
5
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
6
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
7
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
8
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
9
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
10
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
11
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
12
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
13
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
14
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
15
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
16
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
17
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
18
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
19
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
20
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   

खतगव्हाणमध्ये शेतकऱ्यांचे चूलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व ...

माजलगाव : दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नसल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कृषिदिनी तालुक्यातील खतगव्हाण येथे चूलबंद व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी शासनाने ‘ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया’ या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, पीकविमा मिळालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी, तर केंद्र शासन व राज्य शासनाचे ८०० कोटी, असा ८६० कोटी रुपयांचा पीकविमा भरलेला असून, त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रुपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चूलबंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

-------

दोन दिंड्या एकत्र काढून आंदोलन

तुकाराम महाराजांची पालखी १ जुलै रोजी प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पात्रूड व कान्सूर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चूलबंद आंदोलन करत गावातून दिंडी काढत अनोखे आंदोलन करण्यात आले.

--------

शासन उदासीन

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचण असतानाही या शेतकरऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. कृषिदिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चूलबंद आंदोलन करावे लागत आहे.

-गंगाभीषण थावरे, शेतकरी संघर्ष समिती

010721\purusttam karva_img-20210701-wa0026_14.jpg