शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

निर्यात होणाऱ्या कांद्याचा मुक्काम यंदा शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:39 IST

पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते.

ठळक मुद्देकांद्याचा वांदा : भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते. त्यामुळे आष्टी तालुक्यातील कांदा हा हैदराबाद, बेंगलोर, पुणे, पनवेल, येवला, एवढेच नाही तर परदेशातही पोहोचला आहे. कडा बाजार समिती ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील मोठमोठे व्यापारी कांदा खरेदीसाठी याठिकाणी येतात. परंतु यावर्षी ऐन दुष्काळातही तालुक्यात काही प्रमाणात कांदा उत्पादन झाले असून, कांद्याला भाव नसल्याने कांदा मार्केटमध्ये विकण्याऐवजी कांद्याचा मुक्काम शेतातच आहे.आष्टी तालुक्यातील प्रामुख्याने देवळाली, लोखंडवाडी, धामणगाव, घाटपिंपरी, दादेगाव, बीड-सांगवी, देसूर, बेलगाव, किनी, डोंगरगण, सावरगाव, वेलतुरी या व अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली होती. पावसाअभावी ५० ते ६० टक्के कांदा जागेवर जळून गेला आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान दुष्काळामुळे झाले आहे. तर ज्या शेतकºयांनी जिवापाड जपून कसेबसे कांदा पीक जगवून चांगले उत्पादन घेतले त्यालाही भाव मिळत नाही. जिवापाड जपलेल्या कांद्याला आज मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा आज आपल्याला शेतामध्येच पडून राहिलेला दिसत आहे. कांदा पिकाचे उत्पादन कमी होऊनही आज कांद्याला मात्र पाच ते आठ रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति किलो पाच ते सात रुपये खर्च येतो त्यामुळे झालेला खर्चही निघेल का नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहे. त्यामुळे सरकारने काही तरी ठोस भूमिका घेऊन कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी बबन रांझणे, माणिक तळेकर यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडonionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्र