शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निर्यात होणाऱ्या कांद्याचा मुक्काम यंदा शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:39 IST

पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते.

ठळक मुद्देकांद्याचा वांदा : भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते. त्यामुळे आष्टी तालुक्यातील कांदा हा हैदराबाद, बेंगलोर, पुणे, पनवेल, येवला, एवढेच नाही तर परदेशातही पोहोचला आहे. कडा बाजार समिती ही कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील मोठमोठे व्यापारी कांदा खरेदीसाठी याठिकाणी येतात. परंतु यावर्षी ऐन दुष्काळातही तालुक्यात काही प्रमाणात कांदा उत्पादन झाले असून, कांद्याला भाव नसल्याने कांदा मार्केटमध्ये विकण्याऐवजी कांद्याचा मुक्काम शेतातच आहे.आष्टी तालुक्यातील प्रामुख्याने देवळाली, लोखंडवाडी, धामणगाव, घाटपिंपरी, दादेगाव, बीड-सांगवी, देसूर, बेलगाव, किनी, डोंगरगण, सावरगाव, वेलतुरी या व अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली होती. पावसाअभावी ५० ते ६० टक्के कांदा जागेवर जळून गेला आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान दुष्काळामुळे झाले आहे. तर ज्या शेतकºयांनी जिवापाड जपून कसेबसे कांदा पीक जगवून चांगले उत्पादन घेतले त्यालाही भाव मिळत नाही. जिवापाड जपलेल्या कांद्याला आज मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा आज आपल्याला शेतामध्येच पडून राहिलेला दिसत आहे. कांदा पिकाचे उत्पादन कमी होऊनही आज कांद्याला मात्र पाच ते आठ रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति किलो पाच ते सात रुपये खर्च येतो त्यामुळे झालेला खर्चही निघेल का नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहे. त्यामुळे सरकारने काही तरी ठोस भूमिका घेऊन कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी बबन रांझणे, माणिक तळेकर यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडonionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्र