शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका निभवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:02 IST

अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.

ठळक मुद्देआस्तिककुमार पाण्डेय : अयोध्या प्रकरणी संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन

बीड : अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाचा सर्वांनी आदर करावा. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखावा. मानवता हाच खरा धर्म असून एकमेकांना सहकार्य, प्रेम ही खरी या धर्माची शिकवण आहे. सर्वांनी त्याचे पालन करावे. समाजकंटक आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नयेत. असे मजकूर सुजाण नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाच्या किंवा सायबर सेलच्या निदर्शनास आणावेत. शांतता समितीचे सदस्य शांततादूत आहेत. त्यांनी समाजापर्यंत, युवा पिढी, महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवाव असे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील पाण्डेय यांनी यावेळी केले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.निकाल आदरपूर्वक स्वीकारावा : पोद्दारजिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणावरील आगामी निकाल हा संपूर्ण न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल असून तो कोणतीही जात, धर्म, पंथ यांच्याशी जोडलेला नाही. त्यामुळे सर्वांनी तो आदरपूर्वक स्वीकारावा.पोलीस प्रशासन नि:पक्षपाती असल्याबाबत खात्री बाळगा. पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नये. आक्षेपार्ह मजकूर निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशन, सायबर सेल यांच्या निदर्शनास आणावेत.पोलीस प्रशासन सामाजिक सुरक्षततेसाठी कटिबध्द असून हुल्लडबाजी करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्ह्यात १४ ठिकाणी नाकाबंदीअयोध्या प्रकरणी निकालासंदर्भात पोलीस प्रशासनाने योग्या ती कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान कृती आराखड्याची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, यासंदर्भात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध बैठका घेण्यात येत आहेत. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल २४ तास कार्यरत आहे. पथसंचलन, जमावबंदी आदेश, १४ ठिकाणी नाकाबंदी, मोहल्ला बैठका, कोबिंग आॅपरेशन आदि आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय