शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दहा वर्षांपूर्वी दिलेल्या कर्जमाफीत त्रुटी असल्याने ग्रामीण कारागीर अजूनही कर्जदारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 17:53 IST

दहा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने ग्रामीण कारागिरांना दिलेली कर्जमाफी अद्यापही लाभार्थ्यांना मिळाली नाही. सरकारने कर्जमाफी करतेवेळी दिलेला व्याजदर आणि बँकेने प्रत्यक्षात लावलेल्या व्याजदरात तफावत असल्याने पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार ग्रामीण कारागीर कर्जमाफी मिळूनही कर्जदार आहेत.

ठळक मुद्देसरकारने दिलेल्या व बँकेने लावलेल्या व्याजदरात तफावतीमुळे पेच

विलास भोसले 

पाटोदा : दहा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने ग्रामीण कारागिरांना दिलेली कर्जमाफी अद्यापही लाभार्थ्यांना मिळाली नाही. सरकारने कर्जमाफी करतेवेळी दिलेला व्याजदर आणि बँकेने प्रत्यक्षात लावलेल्या व्याजदरात तफावत असल्याने पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार ग्रामीण कारागीर कर्जमाफी मिळूनही कर्जदार आहेत.

समाजातील विविध घटकांना वेगवेगळ्या योजनाद्वारे आणी वेगवेगळ्या वित्तीय संस्थाकडून उद्योग व्यवसायासाठी अर्थ पुरवठा केला जातो. अनुदानही देण्यात येते. राष्ट्रीयीकृत बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कारागीरांना बहुतेक वेळा कर्ज नाकारतात. यामधून मार्ग काढत केवळ ग्रामीण कारागीरांना सक्षम करण्यासाठी राज्यात बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था उभारण्यात आल्या. काही अपवाद वगळता प्रत्येक तालुक्यात या संस्था कार्यरत आहेत. या संस्था जिल्हा मध्यवर्ती बँकांशी जोडण्यात आलेल्या आहेत. संस्थेसाठी स्वतंत्र कर्मचारी अधिकारी नियुक्त आहेत. तालुका अध्यक्ष आणि संचालक कारभार पाहतात. संस्थेच्या माध्यमांतून प्रामुख्याने बारा बलुतेदारांना प्राधान्य दिले जाते. यात प्रामुख्याने मातंग, बौद्ध, चांभार, ढोर, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, शिंपी, बुरुड यांसह ११४ ग्रामीण लघुउद्योजकांना वित्तपुरवठा करण्याचे धोरण आहे.जिल्हा बँकांमुळे संस्था अडचणीतबहुउद्देशीय ग्रामीण संस्थाचा आर्थिक व्यवहार त्या - त्या जिल्हा बँकाशी आणि खादी ग्रामोद्योगशी जोडलेला आहे. राज्याचे चित्र पाहता पश्चिम महाराष्ट्रातील काही बँका वगळता मराठवाडा, विदर्भातील जिल्हा बँका मोडकळीस आलेल्या आहेत. सरकारी अनुदान वितरणाच्या मर्यादित कामकाज एवढेच या बँकांचे अस्तित्व दिसून येते. जिल्हा बँका डबघाईस आल्याने सहकारी संस्थाचा कणाच मोडल्याची सध्यस्थिती आहे.

नऊ वर्षांत पदाधिका-यांसह प्रशासकांचेही दुर्लक्ष२००८ दरम्यान ग्रामीण कारागीरांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला होता. त्यानंतर तीन वर्षांनी बीड जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त करावा लागला. प्रशासकाच्या कालावधीनंतर बँकेच्या निवडणुका होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले, मात्र आतापर्यंत या कर्जमाफीबद्दल कोणतीच कार्यवाही झाली नाही.दहा वर्षानंतरही कर्जाचे ओझे कायमबहुउद्देशीय ग्रामीण संस्था आणि खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो कारागीरांना कर्ज देण्यात आलेले आहे. तत्कालीन सरकारने २००८ मध्ये शेतकºयांबरोबर या कारागीरांनाही कर्जमाफी दिली. त्यांच्याकडील थकीत कर्ज आणि त्यावरील ८ टक्के व्याज माफ करण्यात आले.

कारागीरांना दिलेल्या कर्जावर संस्था प्रत्यक्षात १६ टक्के व्याज आकारणी करते. यामध्ये बँक आकारात असलेल्या १४ टक्के आणि संस्थेचे २ टक्के अशी आकारणी आहे. कर्जमाफी देताना शासनाने ८ टक्के व्याज रक्कम देऊ केली. उर्वरित व्याजात बँकेचे सहा टक्के आणि संस्थेचे दोन टक्के भरपाई कोणी आणि कशी भरायची या प्रश्नामुळे माफी मिळूनही कारागीर कर्जधारकच आहेत.