शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

२१ तास उलटून देखील नदीपात्रात पडलेल्या तरूणाचा शोध लागेना! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 15:14 IST

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घटना

- नितीन कांबळे कडा- कामावरून घरी येताना अचानक चक्कर आल्याने पुलावरून नदीपात्रात पडलेल्या एका ४० वर्षीय तरूणाचा २१ तास उलटून देखील अद्याप शोध लागला नाही. ग्रामस्थांकडून वेगवेगळ्या पद्धतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे. राजेंद्र बापुराव पवळ, असे नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे 

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील राजेंद्र बापुराव पवळ रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान गावालगत असलेल्या पुलावरून घराकडे येत होता. अचानक चक्कर आल्याने राजेंद्र नदीपात्रात पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गावातील एका तरूणाने पाहिल्यानंतर त्याने ग्रामस्थांना याची माहिती दिली. तत्काळ नदीपात्राकडे धाव घेऊन ग्रामस्थांनी शोध सुरू केला. मात्र, दुसरा दिवस उजाडून २१ तास झाले तरी तरुणाचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती केळसांगवीचे सरपंच अजित घुले यांनी दिली.

२१ तास उलटूनही शोध लागेना!लोंखडी गळ, ट्यूबच्या सहाय्याने ग्रामस्थ, पटीचे पोहणारे तरूणाचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत तरूण मिळून आला नाही. तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी आकस्मिक घटनांमध्ये मदत करता येत नसल्याचे सांगितले. 

बीड अग्निशमन पथकाला पाचरणदरम्यान, नदीपात्रात बुडालेल्या तरूणाचा शोध लागत नसल्याने बीड येथील अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले होते. पण दोन तासांच्या प्रयत्नानंतर देखील तरुणाचा  शोध लागला नाही. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस हवालदार अशोक शिंदे, पोलीस नाईक संतोष दराडे, पोलीस शिपाई बिभीषण गूजर आदींनी भेट देऊन सूचना केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड