शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

व्याजाचे पैसे देऊनही मयताची साडे चार एकर जमीन हडपली; दोन सावकारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:44 IST

व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे.

बीड : व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे. याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात सावकार भावंडाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमीनीच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समितीही नियूक्त केल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. दरम्यान, यामध्ये आणखी लोकांची जमीन हडपल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विलास व दत्तात्रय अंगदराव फपाळ (रा.बेलुरा ह.मु.शाहुनगर, माजलगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रामेश्वर गंगाराम उबाळे (रा.दिंद्रुड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मयत भाऊ शिवाजी यांना व्यसन होते. या व्यसनापायी त्यांनी काही कर्ज घेतले होते. २०१० साली त्यांनी आपल्या नावे असलेली जमीन विलास फपाळ यांच्याकडे तारण म्हणून ठेवली. २०१२ साली हा प्रकार त्यांनी कुटूंबियांना सांगितला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. तत्पर्वी शिवाजी यांनी चक्रीवाढ व्याजासह १ लाख ८६ हजार रूपये कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर विलास यांनी ही जमीन परत करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही जमीन कोणालाही कल्पना न देता आपला भाऊ दत्तात्रय यांच्या नावावर केली. 

हा प्रकार समजल्यावर रामेश्वर यांनी दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून विलास व दत्तात्रय यांच्याविरोधात ४२०, ४१७, ४१८, ५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहा.पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके या करीत आहेत. सपोनि सचिन पुंडगे हे सहकार्य करीत आहेत.

त्रिसदस्यीय समिती नियूक्तकर्ज, जमीन व सावकारीची माहिती काढण्यासाठी आणि आणखी किती लोकांची जमीन हडपली, हे समोर आणण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियूक्त केली आहे. यामध्ये सहायक निबंधक, तहसीलदार एन.जी.झंपलवाड व दिंद्रुड ठाण्याचे सपोनि सचिन पुंडगे यांचा समावेश आहे. ही समिती पंचनामा व इतर माहिती जमा करून सहा.अधीक्षक नवटके यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

घाबरू नका, तक्रार देण्यास पुढे या - पोलीसया प्रकरणात आणखी काही लोकांची जमीन गहान खत म्हणून ठेवून घेत ती आपल्या नावावर केल्याचे बोलल जात आहे. तसेच यातील आरोपींना राजकीय पाठबळ व गावात दहशत असल्यामुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे धजावत नाहीत. मात्र आता गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणून आपल्या तक्रारीवर ठाम राहण्यासंदर्भातही पोलिसांनी आवाहन केले आहे.

आरोपींना लवकर अटक करू फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींनाही लवकरच अटक करू. तीन सदस्यीय समितीचा अहवाल लवकरच मिळेल. तक्रारदारांना न्याय देण्याचा आमचा पुर्ण प्रयत्न असेल. अन्याय झाल्यास नागरिकांनी न घाबरता पुढे यावे, आम्ही सोबत आहोत. तपास सुरू असून तो लवकरच पूर्ण करू. - भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक, माजलगाव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीBeedबीडPoliceपोलिस