शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

व्याजाचे पैसे देऊनही मयताची साडे चार एकर जमीन हडपली; दोन सावकारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:44 IST

व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे.

बीड : व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे. याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात सावकार भावंडाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमीनीच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समितीही नियूक्त केल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. दरम्यान, यामध्ये आणखी लोकांची जमीन हडपल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विलास व दत्तात्रय अंगदराव फपाळ (रा.बेलुरा ह.मु.शाहुनगर, माजलगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रामेश्वर गंगाराम उबाळे (रा.दिंद्रुड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मयत भाऊ शिवाजी यांना व्यसन होते. या व्यसनापायी त्यांनी काही कर्ज घेतले होते. २०१० साली त्यांनी आपल्या नावे असलेली जमीन विलास फपाळ यांच्याकडे तारण म्हणून ठेवली. २०१२ साली हा प्रकार त्यांनी कुटूंबियांना सांगितला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. तत्पर्वी शिवाजी यांनी चक्रीवाढ व्याजासह १ लाख ८६ हजार रूपये कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर विलास यांनी ही जमीन परत करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही जमीन कोणालाही कल्पना न देता आपला भाऊ दत्तात्रय यांच्या नावावर केली. 

हा प्रकार समजल्यावर रामेश्वर यांनी दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून विलास व दत्तात्रय यांच्याविरोधात ४२०, ४१७, ४१८, ५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहा.पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके या करीत आहेत. सपोनि सचिन पुंडगे हे सहकार्य करीत आहेत.

त्रिसदस्यीय समिती नियूक्तकर्ज, जमीन व सावकारीची माहिती काढण्यासाठी आणि आणखी किती लोकांची जमीन हडपली, हे समोर आणण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियूक्त केली आहे. यामध्ये सहायक निबंधक, तहसीलदार एन.जी.झंपलवाड व दिंद्रुड ठाण्याचे सपोनि सचिन पुंडगे यांचा समावेश आहे. ही समिती पंचनामा व इतर माहिती जमा करून सहा.अधीक्षक नवटके यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

घाबरू नका, तक्रार देण्यास पुढे या - पोलीसया प्रकरणात आणखी काही लोकांची जमीन गहान खत म्हणून ठेवून घेत ती आपल्या नावावर केल्याचे बोलल जात आहे. तसेच यातील आरोपींना राजकीय पाठबळ व गावात दहशत असल्यामुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे धजावत नाहीत. मात्र आता गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणून आपल्या तक्रारीवर ठाम राहण्यासंदर्भातही पोलिसांनी आवाहन केले आहे.

आरोपींना लवकर अटक करू फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींनाही लवकरच अटक करू. तीन सदस्यीय समितीचा अहवाल लवकरच मिळेल. तक्रारदारांना न्याय देण्याचा आमचा पुर्ण प्रयत्न असेल. अन्याय झाल्यास नागरिकांनी न घाबरता पुढे यावे, आम्ही सोबत आहोत. तपास सुरू असून तो लवकरच पूर्ण करू. - भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक, माजलगाव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीBeedबीडPoliceपोलिस