शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार ; बीडमध्ये शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर काढला विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:13 IST

शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्ह्याच्या कानाकोप-यातून शेतकरी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

बीड : शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघालेल्या या मोर्चात जिल्ह्याच्या कानाकोप-यातून शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतक-यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करून त्यांचा ७/१२ तातडीने कोरा करावा, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून मदत द्यावी, भारनियमन तातडीने बंद करावे, बायपास रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, गतवर्षीच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, खरीप हंगामातील पीक विमा शेतक-यांना तातडीने वाटप करावा, महागाई कमी करावी, पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, पेट्रोल-डिझेलवरील सर्व कर हटवून त्यावर जीएसटी लावून विक्री करावी, शेतक-यांचे ट्रॅक्टर, शेती अवजारांना जीएसटीमधून सूट द्यावी, शेतक-यांच्या शेतातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावे, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व बारा बलुतेदार यांचे सरसकट कर्ज माफ करावे, मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, शेतीमालाला हभी भाव द्यावा, खरेदी केंद्र सुरू करावे, यासारख्या प्रमुख मागण्यांना घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. धनंजय मुंडेंसह इतर नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी सर्वांनीच भाजप सरकारवर कडाडून टीका केली. 

यावेळी धनंजय मुंडेंसह माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित, माजी आमदार उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रेखा फड, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे आदींची प्रमुख उपस्थिती होती.मोर्चानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा चौका-चौकात तैनात केला होता. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस