शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:21 IST

वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरवर लागवड : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रबीची पिके धोक्यात

जाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.पूर्णा, धामना, केळणा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये यावर्षी सर्वाधिक रबीची पेरणी झाली. चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पिके चांगली आली. सध्या रबी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज आहे. परंतु, महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. १० मिनिंटाला लाईट जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील रबी हंगाम धोक्यात आला असून, शेतकरी चिंतेत सापडले आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हैराण झाल्याने शेतक-यांना महावितरण ‘शॉक’ देत आहे.कृषी पंपांना शासनाने भारनियमन ठरवून दिले आहे. अधिका-यांनी शासनाच्या भारनियमां व्यतिरिक्त अधिकचे भारनियमन सुरू केले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी नियोजन न करता आपल्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे. याबाबत अभियंता डब्ल्यू. आर. गांधीले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.लागवड : उसाच्या क्षेत्रात वाढयावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८ हजार ७०० हेक्टरवर पेरण्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात रबीच्या पिकाची लागवड जवळपास २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.पाऊस चांगला असल्याने यावर्षी शाळू ज्वारीची पेरणी ५ हजार ६२४, मका २ हजार ४०२, गहू ३ हजार ४३६, हरबरा ७ हजार २३६, करडई १० एकरवर पेरणी करण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यात उसाच्या क्षेत्रात देखील वाढ होणार असून, सीडस् कांद्याची सुध्दा शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु, सध्या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके हातातून जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalanaजालनाmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी