शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गुणवता रक्षणासाठी आबालवृध्दांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:06 IST

शनिवारी बीडमध्ये अनारक्षितांचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. कुठल्याही जातीला, कोणाच्या आरक्षणाला विरोध न करता केवळ गुणवत्तेच्या रक्षणासाठी काढण्यात आलेला शहराच्या इतिहासातील हा अभूतपूर्व, ऐतिहासिक मोर्चा ठरला. उत्स्फूर्त सहभाग

ठळक मुद्दे‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ । बीडमध्ये अनारक्षितांचा अभूतपूर्व मूक मोर्चा; उच्च शिक्षणासाठी आरक्षण पूर्णत: बंद करण्याची मागणी

बीड : अतिआरक्षण देशाचे भक्षण, वेळीच नाही घातला आळा तर देशाचा होईल खुळखुळा, गुणवत्ता वाचवा देश वाचवा, हमें न्याय चाहिए, खैरात नहीं, राष्टÑ की पहचान योग्यता है, आरक्षण नहीं असे घोषफलक हाती घेत शनिवारी बीडमध्ये अनारक्षितांचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. कुठल्याही जातीला, कोणाच्या आरक्षणाला विरोध न करता केवळ गुणवत्तेच्या रक्षणासाठी काढण्यात आलेला शहराच्या इतिहासातील हा अभूतपूर्व, ऐतिहासिक मोर्चा ठरला.उत्स्फूर्त सहभागमहाराष्ट्रात सध्या आरक्षणाची टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अत्याधिक आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील शिक्षणाच्या प्रगतीची दारे बंद होत आहेत. भावी पिढीचे भविष्य अंधकारमय होत आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी काढलेल्या मोर्चात अनारक्षित प्रवर्गातील सर्व समुहातील आबालवृद्ध शिक्षक, वकील, अभियंता, डॉक्टर, व्यापारी तसेच बुद्धिजीवी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चात उस्फूर्त सहभाग नोंदविला.शनिवारी सकाळी साडेसात वाजेपासून बालाजी मंदिरच्या सभागृहाकडे मोर्चेकरी येत होते. काही वेळातच संख्या वाढत गेली. ठरवून दिलेल्या पार्किंगस्थळी वाहने लावण्यात येत होती. तर मोर्चेकऱ्यांना रिबीन टोपी आणि फलकांचे वाटप करण्यात आले. बालाजी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर अनारक्षित संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर उपस्थित होते. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचे वाचन सिद्धी सीताराम बांगड हिने केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.या मागण्यांसाठी निघाला मोर्चाकोणत्याही प्रकारचे आरक्षण ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असावे. उर्वरित सर्व जागा पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर घ्याव्यात. सरकारकडून एका कमिटीच्या आधारे जातीआधारित आरक्षणाचे अवलोकन करण्यात यावे. क्रि मीलेअरच्या योग्य उत्पन्नाचे सर्वेक्षण करावे. कोणत्याही आरक्षित वर्गाच्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गाची जागा मिळू नये यासाठी तरतूद करावी. चुकीच्या पद्धतीने जाती किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र घेणाºया उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यात यावा. दर पाच वर्षांनी आरक्षणाचे परिक्षण व आढावा घ्यावा. आरक्षणाचा लाभ एकच व्यक्ती अथवा कुटुंबाला वारंवार मिळू नये यासाठी उपाययोजना केल्यास आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळेल अशी व्यवस्था करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :Beedबीडreservationआरक्षणMorchaमोर्चा