शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या 'त्या' भामट्यांनी यापूर्वी बेराेजगारांनाही ९६ लाखांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:13 IST

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक: व्हेटरनरी डॉक्टरचा आरोपींमध्ये समावेश

बीड : महाराष्ट्र जलसंजीवनी सौर ऊर्जा कृषिपंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्रूा तिघांना सायबर सेलने अटक केली. या भामट्यांनी यापूर्वी औरंगाबादेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना सुमारे ९६ लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये व्हेटरनरी डॉक्टरचादेखील समावेश आहे.

किशोर विठ्ठल काळे (२८, रा.आपेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) , रोहिदास रामलाल कुसळकर (५२, रा.पैठणरोड नक्षत्रवाडी, औरंगाबाद) , संदीप लक्ष्मण गायकवाड (२८, रा.औरंगपूरवाडी, ता.पैठण, जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी गायकवाड हहा व्हेटनरी डॉक्टर असून, जून व ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी औरंगाबाद व परिसरातील बेरोजेगार २४ युवकांकडून पोस्ट खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ९६ लाख रुपये उकळले होते. मात्र, नंतर आश्वासन पूर्ण केले नाही. या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे किशोर काळेचा विश्वास वाढला.

औरंगाबाद पोलिसांची कुचराई नडली...डॉ. संदीप गायकवाड व रोहिदास कुसळकर याने बेरोजगारांकडून पैसे गोळा करुन किशोर काळेला दिले होते. पण नंतर त्याने मोबाइल बंद करून गायब झाला होता. बेरोजगार युवकांचा तगादा वाढल्याने डॉ. संदीप गायकवाड यानेच पुढाकार घेत औरंगाबादेत पोलीस आयुक्त, छावणी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंतर काही युवकांचे पैसे परत करून त्यांना शांत करण्यात आले.बेरोजगारांकडून तक्रार करणारा डॉ. संदीप गायकवाडने पुढेदेखील किशोर काळे व रोहिदास कुसळकर यांच्याशी हातमिळवणी केली व शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बनावट कृषी योजना आणली. दरम्यान, तेव्हाच औरंगाबाद येथील पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर ठोस कारवाई केली असती तर शेतकऱ्यांची फसवणूक टळली असती.

संबंधित आरोपींनी बनावट कृषी योजनेसाठी बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील ६७२ शेतकऱ्यांचे ९४७ फॉर्म भरून घेत ३३ लाख रुपयांची रक्कम उकळल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी बेरोजगारांनादेखील फसविल्याचे समजले आहे. त्यांच्या फसवणुकीला बळी पडलेल्यांनी पुराव्यानिशी तक्रार देण्यास पुढे यावे.- रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादBeedबीड