शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाची टंचाई, विजनिर्मितीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:18 IST

नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा एक दिवस पुरेल एवढाच  उपलब्ध आहे.

परळी (बीड ) : नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा  एक दिवस पुरेल एवढाच  उपलब्ध आहे. त्यामुळे संच बंद पडून विज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. आज नविन औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येकी 250 मे.वॅ.क्षमतेचे तीन संच चालू होते. सायं. 6 च्या सुमारास 3 संचातून 615 मे.वॅ.एवढी विजनिर्मिती चालू होती तर 135 मे.वॅ.विजेची तुट भासली. 

परळी तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील नविन औष्णिक विद्युत केंद्रात 250 मे.वॅ.स्थापित क्षमतेचे संच क्र.6,7 व 8 हे तीन संच आहेत. या तीन संचाची एकूण क्षमता 750 मे.वॅ एवढी आहे. कोळशा अभावी विजनिर्मितीवर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी तिन्ही संचातून 615 मे.वॅ. एवढे विजेचे उत्पादन चालू होते.  काही दिवसांपासून कोळशाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही. मंगळवारी 1 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली. 

मुख्य अभियंता श्री प्रकाश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नविन औष्णिक विद्युत केंद्रातील तिन्ही संच मंगळवारी चालू होते. प्रत्येक संचातून 205 मे.वॅ. एवढी विज निर्मिती चालू आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रात एक दिवस पुरेल एवढा कोळसा साठा उपलब्ध आहे. कोळशाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी मुख्य कार्यालय मुंबईकडे पाठपुरावा चालू आहे. वणी ,चंद्रपूर व हैद्राबाद जवळील खाणीतून रेल्वे वॅगन ने परळी विदुत केंद्रात कोळसा येतो.

नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रं.6 देखभाल दुरूस्ती नंतर 8 सप्टेंबर पासून कार्यान्वीत झाला आहे. तर संच क्रं. 7 व 8 हे दोन संच पुर्वीपासूनच चालू आहेत. मुख्यअभियंता प्रकाश खंडारे हे परळी औष्णिक विद्युत केंद्रात कांही दिवसांपुर्वीच रूजू झाले आहेत. त्यांनी कामाची चुनूक दाखविण्यास सुरूवात केली आहे. विजनिर्मिती वाढविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय साधून व त्यांच्याकडून कामे करून घेवून परळी औष्णिक विद्युत केंद्राची विजनिर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

जुने बंद संच ही चालू करावे परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.3,4 व 5 हे तीन संच गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. त्याचा परळीच्या बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. कंत्राटदार व सप्लायर्स यांचेही कामे बंद झाली आहेत. त्यामुळे परळीत बेरोजगारी वाढली आहे. यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही लक्ष घालून जुने तीन संच चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. 

टॅग्स :electricityवीजBeedबीडmahavitaranमहावितरण