शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाची टंचाई, विजनिर्मितीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:18 IST

नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा एक दिवस पुरेल एवढाच  उपलब्ध आहे.

परळी (बीड ) : नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा  एक दिवस पुरेल एवढाच  उपलब्ध आहे. त्यामुळे संच बंद पडून विज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. आज नविन औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येकी 250 मे.वॅ.क्षमतेचे तीन संच चालू होते. सायं. 6 च्या सुमारास 3 संचातून 615 मे.वॅ.एवढी विजनिर्मिती चालू होती तर 135 मे.वॅ.विजेची तुट भासली. 

परळी तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील नविन औष्णिक विद्युत केंद्रात 250 मे.वॅ.स्थापित क्षमतेचे संच क्र.6,7 व 8 हे तीन संच आहेत. या तीन संचाची एकूण क्षमता 750 मे.वॅ एवढी आहे. कोळशा अभावी विजनिर्मितीवर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी तिन्ही संचातून 615 मे.वॅ. एवढे विजेचे उत्पादन चालू होते.  काही दिवसांपासून कोळशाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही. मंगळवारी 1 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली. 

मुख्य अभियंता श्री प्रकाश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नविन औष्णिक विद्युत केंद्रातील तिन्ही संच मंगळवारी चालू होते. प्रत्येक संचातून 205 मे.वॅ. एवढी विज निर्मिती चालू आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रात एक दिवस पुरेल एवढा कोळसा साठा उपलब्ध आहे. कोळशाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी मुख्य कार्यालय मुंबईकडे पाठपुरावा चालू आहे. वणी ,चंद्रपूर व हैद्राबाद जवळील खाणीतून रेल्वे वॅगन ने परळी विदुत केंद्रात कोळसा येतो.

नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रं.6 देखभाल दुरूस्ती नंतर 8 सप्टेंबर पासून कार्यान्वीत झाला आहे. तर संच क्रं. 7 व 8 हे दोन संच पुर्वीपासूनच चालू आहेत. मुख्यअभियंता प्रकाश खंडारे हे परळी औष्णिक विद्युत केंद्रात कांही दिवसांपुर्वीच रूजू झाले आहेत. त्यांनी कामाची चुनूक दाखविण्यास सुरूवात केली आहे. विजनिर्मिती वाढविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय साधून व त्यांच्याकडून कामे करून घेवून परळी औष्णिक विद्युत केंद्राची विजनिर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

जुने बंद संच ही चालू करावे परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.3,4 व 5 हे तीन संच गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. त्याचा परळीच्या बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. कंत्राटदार व सप्लायर्स यांचेही कामे बंद झाली आहेत. त्यामुळे परळीत बेरोजगारी वाढली आहे. यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही लक्ष घालून जुने तीन संच चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. 

टॅग्स :electricityवीजBeedबीडmahavitaranमहावितरण