शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाची टंचाई, विजनिर्मितीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:18 IST

नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा एक दिवस पुरेल एवढाच  उपलब्ध आहे.

परळी (बीड ) : नविन औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मिती साठी लागणारा कोळसा  एक दिवस पुरेल एवढाच  उपलब्ध आहे. त्यामुळे संच बंद पडून विज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. आज नविन औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येकी 250 मे.वॅ.क्षमतेचे तीन संच चालू होते. सायं. 6 च्या सुमारास 3 संचातून 615 मे.वॅ.एवढी विजनिर्मिती चालू होती तर 135 मे.वॅ.विजेची तुट भासली. 

परळी तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील नविन औष्णिक विद्युत केंद्रात 250 मे.वॅ.स्थापित क्षमतेचे संच क्र.6,7 व 8 हे तीन संच आहेत. या तीन संचाची एकूण क्षमता 750 मे.वॅ एवढी आहे. कोळशा अभावी विजनिर्मितीवर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी तिन्ही संचातून 615 मे.वॅ. एवढे विजेचे उत्पादन चालू होते.  काही दिवसांपासून कोळशाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही. मंगळवारी 1 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली. 

मुख्य अभियंता श्री प्रकाश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नविन औष्णिक विद्युत केंद्रातील तिन्ही संच मंगळवारी चालू होते. प्रत्येक संचातून 205 मे.वॅ. एवढी विज निर्मिती चालू आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रात एक दिवस पुरेल एवढा कोळसा साठा उपलब्ध आहे. कोळशाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी मुख्य कार्यालय मुंबईकडे पाठपुरावा चालू आहे. वणी ,चंद्रपूर व हैद्राबाद जवळील खाणीतून रेल्वे वॅगन ने परळी विदुत केंद्रात कोळसा येतो.

नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रं.6 देखभाल दुरूस्ती नंतर 8 सप्टेंबर पासून कार्यान्वीत झाला आहे. तर संच क्रं. 7 व 8 हे दोन संच पुर्वीपासूनच चालू आहेत. मुख्यअभियंता प्रकाश खंडारे हे परळी औष्णिक विद्युत केंद्रात कांही दिवसांपुर्वीच रूजू झाले आहेत. त्यांनी कामाची चुनूक दाखविण्यास सुरूवात केली आहे. विजनिर्मिती वाढविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय साधून व त्यांच्याकडून कामे करून घेवून परळी औष्णिक विद्युत केंद्राची विजनिर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

जुने बंद संच ही चालू करावे परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.3,4 व 5 हे तीन संच गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. त्याचा परळीच्या बाजारपेठेतील उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. कंत्राटदार व सप्लायर्स यांचेही कामे बंद झाली आहेत. त्यामुळे परळीत बेरोजगारी वाढली आहे. यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही लक्ष घालून जुने तीन संच चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. 

टॅग्स :electricityवीजBeedबीडmahavitaranमहावितरण