शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वीज खंडित झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ५० गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:15 IST

अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न गंभीर : विजेअभावी जनजीवन विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.वादळी वारा व पावसामुळे नागरिकांना उकाडयापासून दिलासा मिळाला. मात्र बारा विद्युतखांब पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सारडगाव, धर्मापुरी, उजनी, पट्टीवडगाव ३३ केव्ही सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विहिरी, बोअरची पाण्याची पातळी खालावली असून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी शोधणे अवघड झाले आहे. सतर ते ऐंशी फुटापर्यंत शेतकºयांनी विहिरीचे खोदकाम केले. एकाही शेतकºयाच्या विहिरीला पायरी नसल्याने पाणी बघत बसणे हाच प्रयत्न शिल्लक राहिला आहे. तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. तर विजेअभावी अनेक गावांमध्ये पिठाच्या गिरण्या गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वादळी वाºयामुळे झाडाच्या फांद्या तारेवर मोडून पडल्यामुळे काही ठिकाणी ताराही तुटल्या आहेत. ४८ तास उलटून गेले तरी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे कामात दिरंगाई होत असल्यामुळे पन्नास गावच्या ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.वादळामुळे झाडे तारांवर पडल्याने नुकसानया संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेश अंबेकर यांच्याकडे विचारणा केली असता जिथे जिथे विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. तिथे कामे सुरू आहेत. मात्र वादळी वाºयामुळे मोठी झाडेदेखील विद्युत तारांवर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येत्या दोन दिवसांत प्राधान्यक्रम देऊन ती कामे पूर्ण करण्यात येतील, असे अभियंता अंबेकर म्हणाले.

टॅग्स :electricityवीजBeedबीडmahavitaranमहावितरणWaterपाणी