शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

अतिवृष्टीने हातची पिके गेली, नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 18:41 IST

शेतातील पिके तर गेलीच पण अनेक गावातील नदीला पुर आल्याने गावचा संपर्क देखिल तुटला आहे.

गेवराई : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री तालुक्यातील रेवकी, जातेगांव, तलवाडा,पाचेगावं,सिरसदेवी, मादळमोही या भागात पुन्हा अतिवृष्टी झाली. शेतातील पिके तर गेलीच पण अनेक गावातील नदीला पुर आल्याने गावचा संपर्क देखिल तुटला आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसा पूर्वी तालुक्यातील दहाही मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या हातातोडाशी आलेला घास हिरावून घेतला. तर अनेक गावचा संपर्क देखिल तुटला होता. त्यात पुन्हा भर म्हणजे सोमवार रोजी रात्रभर तालुक्यातील रेवकी, जातेगांव, तलवाडा, पाचेगावं, सिरसदेवी,मादळमोही या भागात अतिवृष्टी झाल्याने पिके तर गेली. मात्र, राजापुर गावचा संपर्क तुटला आहे. तसेच रेवकी गावात विद्रुपा नदीला पुर आल्याने रेवकी गावातील शाळा, आरोग्य केद्रंसह गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तालुक्यातील रोहीतळ येथील लेंडी नदीला व अर्धामसला येथील नदीला पाणी आल्याने गावचा तब्बल पाच तास संपर्क तुटला होता. तसेच विविध गावातील नदी, नाले, ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

तालुक्यातील दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. नदी, नाल्यात, ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जाऊ नये व आपला जीव धोक्यात घालु नये असे आवाहन प्रभारी तहसीलदार शामसुंदर रामदासी यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस