शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

थकबाकीमुळे ११ गावांचा पाणीपुरवठा तोडला; भर उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 7:30 PM

माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे.

माजलगाव (बीड ) : माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. पाणी पुरवठ्याची थकबाकी या गावांकडे आहे. याच्या वसुलीसाठी पालिकेने आज या गावांचा  पाणी पुरवठा खंडित केला. यामुळे येथील ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

माजलगाव धरणाच्या निर्मितीसाठी तालुक्यातील २२ गावांतील ग्रामस्थांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांच्या त्यागामुळे माजलगाव धरण उभारले. यामुळे आज तीन जिल्ह्यातील ८५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. तसेच यामुळे बीड, माजलगाव शहरासह ११ पुनर्वसित गावच्या नागरिकांची तहान भागते. 

माजलगाव शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या ११ पुनर्वसित गावांसाठी वीस वर्षापूर्वी संयुक्त पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्रासह सुरु झाली. तेव्हांपासून या गावांना नगरपालिका पाणीपुरवठा करते. यासाठीचा कर मागील काही वर्षांपासून या गावांकडे थकीत आहे. मागील १५ वर्षांपासून याबाबत काही कारवाई झाली नाही. मात्र, याबाबत नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी अचानक निर्णय घेत थकबाकी वसुलीसाठी या गावांचा पाणी पुरवठा खंडीत केला. यामुळे भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही यामुळे ज्या धरणासाठी सर्वस्व दिले तेथील पाण्यासाठीच या ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. 

पालिकेने किती सहन करायचे पालिकेला महिन्याकाठी लाखो रुपयाचे वीजबिल भरावे लागते. पालिकेने एकट्यानेच हा भुर्दंड का सहन करायचा ? यापुढे पैसे भरल्याशिवाय पाणी सुरु करणार नाहीत.- सहाल चाऊस, नगराध्यक्ष.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMajalgaon Damमाजलगाव धरणWomenमहिलाMuncipal Corporationनगर पालिका