शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत ...

ठळक मुद्देदोन वेळा काम बंद; नोटिसीचा परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन द्यावे तसेच अनुभवाच्या आधारे प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी या कर्मचाºयांचा लढा सुरु आहे. ११ एप्रिलपासून ६०० कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. जिल्हा परिषदेसमोर सलग १२ दिवस त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर आरोग्य संचालकांनी दहा दिवसांचा अवधी मागून बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या कालावधीत शासनाकडून बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी ८ मेपासून या कर्मचा-यांनी पुन्हा काम बंद पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले.१६ मेपर्यंत सुरु राहिलेल्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य संघटनेने पुकारलेल्या लॉँगमार्चसाठी ६०० कर्मचारी नाशिककडे रवाना झाले आहेत. १८ मेपासून नाशिक ते मुंबई लॉँगमार्च काढण्यात येणार आहे. २८ मेपर्यंत लॉँगमार्च मुंबईत पोहचणार असल्याचे कर्मचारी नेते आर. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.कर्मचाºयांचे आंदोलन सुरु असल्याने आरोग्य सेवेवर होणा-या परिणामामुळे एनआरएचएम समितीचे अध्यक्ष तथा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या कर्मचा-यांना ४८ दिवसांच्या आत कामावर हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या नोटिसा आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गर्दीएनआरएचएम कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे आरोग्य सत्र सेवा बंद पडली आहे. ग्रामीण भागात प्रसूती इतर उपचार होत नसल्याने रुग्णांची उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली आहे.

बाल आरोग्य सेवेवरही परिणामजिल्हा रुग्णालयात कमी वजनाच्या बाळांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) आहे. तेथे नियुक्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या सरकारी रुग्णालयातील स्थायी कर्मचा-यांना बोलविण्यात आले आहे. मात्र ते प्रशिक्षित नसल्याने ही उपचार सेवा थंडावली आहे.

‘आयुष्यमान भारत’ ला अडथळाभारत सरकारने जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. यासाठी ३० मे पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश आहेत. मात्र या कामावर आशांनी बहिष्कार टाकल्यामुळे व कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे ही नोंदणी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही.