शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

औषध प्रशासनाने कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST

वडवणी : तालुक्यातील चिंचाळा, परडी माटेगाव, धानोरा, देवडी, काडीवडगाव, साळींबा, चिंचोटी, चिंचवण, चिखलबीड आदी गावांमध्ये आजही सर्रासपणे बंदी असतानाही ...

वडवणी : तालुक्यातील चिंचाळा, परडी माटेगाव, धानोरा, देवडी, काडीवडगाव, साळींबा, चिंचोटी, चिंचवण, चिखलबीड आदी गावांमध्ये आजही सर्रासपणे बंदी असतानाही गुटख्याची विक्री केलेली आढळून येत आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवून तत्काळ कारवाई करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.

कार्यालयात अस्वच्छता

बीड : येथील विविध शासकीय कार्यालय परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे. पालिकेच्या मदतीने या ठिकाणी मोहीम राबवण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्वच्छता करून घेण्याची मागणी होत आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

केज : शहरातील बसस्थानक, कळंब रोड, बीड रोड, धारूर रोड या मार्गावरून खासगी वाहनधारक वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अवैध वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम राबवत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मद्यपींचा वावर

शिरूर कासार : तालुक्यातील रायमोहा परिसरात सध्या अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा वावर वाढला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी हे मद्यपी पडलेले दिसतात. दारू विक्री बंद करण्याची मागणी महिला आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे.

वाळू उपसा वाढला, गाव रस्ते झाले खराब

गेवराई : तालुक्यातील तलवाडा आणि इतर परिसरातून अवैध वाळू वाहतुकीसह उपसा वाढला आहे. महसूल प्रशासन व पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या वाहतुकीमुळे अनेक गावांमधील रस्ते खराब झाले आहेत.

सर्वत्र खड्डेच खड्डे

बीड : शहरातील नगर रोडहून धानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी साचत असून, मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. नगरपालिका आणि बांधकाम विभागाने याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

उन्हाळ्याची चाहूल, रसवंती फिरू लागली

किट्टी आडगाव : वातावरणातील गारवा कमी होऊन, हळूहळू का होईना उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव परिसरामध्ये फिरती रसवंती बच्चे कंपनीसह मोठ्यांना आकर्षित करीत आहेत. यातून विक्रेत्याला रोजगारही मिळत आहे. यावर्षी परिसरात उसाचे पीकही चांगले आले आहे. कारखान्याला न जाणारा ऊस रसवंती, गुऱ्हाळासाठी शेतकरी देत आहेत.