शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

औषध प्रशासनाने कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST

वडवणी : तालुक्यातील चिंचाळा, परडी माटेगाव, धानोरा, देवडी, काडीवडगाव, साळींबा, चिंचोटी, चिंचवण, चिखलबीड आदी गावांमध्ये आजही सर्रासपणे बंदी असतानाही ...

वडवणी : तालुक्यातील चिंचाळा, परडी माटेगाव, धानोरा, देवडी, काडीवडगाव, साळींबा, चिंचोटी, चिंचवण, चिखलबीड आदी गावांमध्ये आजही सर्रासपणे बंदी असतानाही गुटख्याची विक्री केलेली आढळून येत आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवून तत्काळ कारवाई करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.

कार्यालयात अस्वच्छता

बीड : येथील विविध शासकीय कार्यालय परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे. पालिकेच्या मदतीने या ठिकाणी मोहीम राबवण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्वच्छता करून घेण्याची मागणी होत आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

केज : शहरातील बसस्थानक, कळंब रोड, बीड रोड, धारूर रोड या मार्गावरून खासगी वाहनधारक वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अवैध वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम राबवत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मद्यपींचा वावर

शिरूर कासार : तालुक्यातील रायमोहा परिसरात सध्या अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा वावर वाढला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी हे मद्यपी पडलेले दिसतात. दारू विक्री बंद करण्याची मागणी महिला आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे.

वाळू उपसा वाढला, गाव रस्ते झाले खराब

गेवराई : तालुक्यातील तलवाडा आणि इतर परिसरातून अवैध वाळू वाहतुकीसह उपसा वाढला आहे. महसूल प्रशासन व पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या वाहतुकीमुळे अनेक गावांमधील रस्ते खराब झाले आहेत.

सर्वत्र खड्डेच खड्डे

बीड : शहरातील नगर रोडहून धानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी साचत असून, मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. नगरपालिका आणि बांधकाम विभागाने याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

उन्हाळ्याची चाहूल, रसवंती फिरू लागली

किट्टी आडगाव : वातावरणातील गारवा कमी होऊन, हळूहळू का होईना उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव परिसरामध्ये फिरती रसवंती बच्चे कंपनीसह मोठ्यांना आकर्षित करीत आहेत. यातून विक्रेत्याला रोजगारही मिळत आहे. यावर्षी परिसरात उसाचे पीकही चांगले आले आहे. कारखान्याला न जाणारा ऊस रसवंती, गुऱ्हाळासाठी शेतकरी देत आहेत.