शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर

By शिरीष शिंदे | Updated: October 2, 2023 18:22 IST

पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका

बीड : महसूल विभागाने हंगामी पैसेवारी जाहीर केली असून पावसाने पाठ फिरविल्याचा फटका पिकांना बसला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची खरीप हंगामी पैसेवारी ४८.०७ जाहीर केली आहे. या पैसेवारीवरून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानले जात आहे. 

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पूर्वी पैसेवारीचा आधार घेतला जात असे. परंतु आता वेगवेगळे निकष ग्राह्य धरून दुष्काळ जाहीर केला जातो. त्यात माती आर्द्रता, पीक कापणी प्रयोग, पाणी पातळी यासह इतर बाबींचा समावेश आहे. असे असले तरी पैसेवारी महत्त्वाची मानली जाते. महसूल विभागाने ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून सरासरी पैसेवारी ही ४८.०७ एवढी जाहीर करण्यात आली आहे. तालुकानिहाय आकडेवारीचे अवलोकन केले तर गेवराई तालुक्याची पैसेवारी ५४.१९ असल्याचे दिसून येते. त्यामुळे गेवराई तालुक्यातील पिकांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे.

१४०३ गावांचा समावेशपैसेवारी काढण्यासाठी बीड जिल्ह्यातील १४०३ गावांचा समावेश करण्यात आला होता. पैसेवारी काढण्यासाठी पाहणी केलेले हेक्टर उत्पादन, प्रमाण उत्पादन पाहिले जाते. प्रत्येक प्रमुख पिकांचे किमान ६ कापणी प्रयोग घेण्यात येतात. पीक कापणी प्रयोगासाठी शेत निवडण्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाते. पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर पिकांच्या पेरणी क्षेत्राचे प्रमाण व कापणी प्रयोगाअंती आलेली पैसेवारी यांची भारांकित सरासरी काढली जाते. त्यानुसार महसूल गावाची पैसेवारी काढली जाते.

कृषी विभागाने पूर्वीच वर्तविला होता अंदाजजिल्ह्यात पावसाने दडी मारली असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पिकांची वाढ पावसाअभावी खुंटलेली आहे. परिणामी पीक परिस्थिती चिंताजनक आहे. एक महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड असल्याने उत्पादकतेत ५० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तवली होती. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. सद्यस्थितीला सोयाबीनवर पिवळा मोझॅक हा रोग पसरला असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

अशी आहे तालुक्यांची पैसेवारीबीड-४६.००आष्टी-४६.००पाटोदा-४६.५९वडवणी-४८.४०शिरुर-५०.७९गेवराई-५४.१९अंबाजोगाई-४८.००केज-४७.३७माजलगाव-४८.५७धारुर-४५.०३परळी-४७.८३एकूण- ४८.०७

टॅग्स :RainपाऊसBeedबीडdroughtदुष्काळ