शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:53 IST

शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी केलेली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.

ठळक मुद्देरबी हंगामातील पेरणीच्या तोंडावरच अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले.

- प्रभात बुडूख

बीड : जिल्ह्यात रबी हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर असून, यापैकी फक्त २२.९५ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे. 

कापूस या पिकाचे दोन्ही हंगामात उत्पादन घेतले जाते. परंतु, रबी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये खरीप हंगामातील कापूस, सोयबीन या मुख्य पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी रबी हंगामातील ज्वारी, गहू, मका, हरभरा या मुख्य पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात रबी हंगामातील क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर आहे. त्यापैकी फक्त ९७ हजार ३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीची ८५ हजार ९६८ हेक्टरवर व हरभऱ्याची १० हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.  अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पेरणीला उशीर झाला असून अजूनही अनेक ठिकाणी वापसा आलेला नसल्यामुळे पेरणी करणे शक्य नाही. नोव्हेंबर अखेरपर्यंत रबी  पेरा पूर्ण होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

पेरणीपुढेच पाऊसरबी हंगामात प्रामुख्याने ज्वारी हे पीक घेतले जाते. यामुळे जनावरांची चारा व धान्य या दोन्हीची गरज भागते. त्यामुळे अनेक शेतकरी रबीसाठी क्षेत्र राखून ठेवतात किंवा सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर रबी हंगामातील पेरणी त्या क्षेत्रावर करतात. दरम्यान, रबी हंगामातील पेरणीच्या तोंडावरच अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले. यावेळी शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी केलेली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.  

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस