शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘निधी कमी पडू देणार नाही’ -पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:41 IST

बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच अंबाजोगाईसाठी योगेश्वरी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून ते मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

ठळक मुद्देअंबाजोगाईत विविध विकास कामांचे लोकार्पण

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच अंबाजोगाईसाठी योगेश्वरी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून ते मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.अंबाजोगाईत सोमवारी दुपारी बस स्थानकाच्या इमारतीचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण. तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, जीम हॉल, कार्यालय इमारत, धावमार्ग व मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.व्यासपीठावर आ.संगीता ठोंबरे, विभाग नियंत्रक जालिंदर शिरसट, क्रीडा संचालक उर्मिला मोराळे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार संतोष रुईकर, गयाबाई कराड, सविता लोमटे, संतोष हांगे, राजेश कराड, सुनील लोमटे, संजय गंभीरे, अविनाश तळणीकर, कमलाकर कोपले, दिलीप काळे व मान्यवर उपस्थित होते.यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात विकासाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पुढच्या पाच वर्षात तर जिल्ह्यत विकासासाठी सुवर्णकाळ राहील. रेल्वे, पाणी, रस्ते ही कामे मार्गी लावली.आगामी काळात सिंचन, रोजगार, उद्योगवाढीसाठी चालना देणार आहे. जिल्हा विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.या प्रसंगी बोलतांना आ.संगीता ठोंबरे म्हणाल्या, अंबाजोगाई शहरातील क्रीडा संकुल व बस स्थानक हे रखडलेले प्रश्न आपण मार्गी लावले. कोट्यवधी रुपये निधी खर्च करून शहरात विकास कामे केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उर्मिला मोराळे, जालिंदर शिरसाट यांची भाषणे झाली.प्रास्ताविक राम कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनंत लोमटे यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.मोर्चा हास्यास्पद : धनंजय मुंडेंवर टीकास्त्रपीकविमा व वैद्यनाथ कारखाना या प्रश्नावर मोर्चा काढला. शासन विम्याची रक्कम आठवड्यात देईल. साखर कारखान्याने ८० टक्के ऊसाची रक्कम सभासदांना दिली आहे.उर्वरित २० टक्के रक्कमेचा हप्ता दिवाळीपूर्वी दिला जाईल. हे माहीत असताना ही मोर्चा काढणे हे हास्यास्पद आहे.ज्यांनी कारखान्याच्या जमिनी विकल्या,ज्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. त्यांनी मला शिकवू नये. असे त्यांनी ठणकाऊन सांगितले.अंबाजोगाई-परळी रखडलेल्या रस्त्यांसाठी परत निधी प्राप्त झाला असून हे काम लवकरच मार्गी लागेल, असे सांगून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तत्पर असल्याचे पालकमंत्री मुंडे याप्रसंगी म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेAmbajogaiअंबाजोगाई