शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:04 IST

मुख्यमंत्री साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल.

किल्लेधारूर (बीड) : जायभायवाडी येथे २० पेक्षा पटसंख्या कमी असल्याने गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डोंगर भागातील ऊस तोडणी करणाऱ्यांचे गाव असलेल्या येथील  शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांने व्यथित होत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. उसतोड कामगारांची आहोत, इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचे आपल्या पत्रात नमूद केल्याने या पत्रानंतर तरी शिक्षण विभागाला पाझर फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २०  पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली. दुसऱ्या शाळेत जायचे म्हणजे, छाती इतक्या पाण्यातून रस्ता आहे. आम्ही पहिली दुसरीचे मुले कसे जाणार? शाळा बंद झाली तर आम्ही देखील पालकांसारखे उसतोड मजूर बनू, असेही या विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका होत आहे. आता या पत्रानंतर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.  

असे आहे विद्यार्थ्याचे पत्र: 

''मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र, पत्र लिहिल्यास कारण की,साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल. म्हणून तुम्हाला माझी कळकळीच विनंती आहे की माझी शाळा बंद करू नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणि आते आहे. आम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दूसरीची मुले आहोत मग आम्ही कसे जायचे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, माझी शाळा बंद करू नका. माझं गाव डोंगरांच्या कुशीत वसलेल आहे.- समाधान बाबासाहेब जायभाये''

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र