शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

८५ टक्के जळीत रुग्णाला वाचविले; 'स्वाराती' रुग्णालयाच्या सर्जरी विभागाची विक्रमी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 14:16 IST

सर्जरी विभागातील डॉक्टरांच्या चमूने रुग्णास अक्षरश: मृत्युच्या दाढेतून परत आणले.

- अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई (जि.बीड) : एखादा व्यक्ती गंभीर भाजणे हीच मुळात अंगावर शहारे आणणारी बाब. त्यातच तो जळीत रुग्ण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेला असेल तर  त्याचा जीव वाचण्याची शक्यता नसतेच. परंतु, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सर्जरी विभागातील डॉक्टरांच्या चमूने ८५ टक्के भाजलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करून त्याला अक्षरश: मृत्युच्या दाढेतून परत आणले.

माजलगाव तालुक्यातील मोटेवाडी येथील रामेश्वर शंकर चव्हाण (वय २५) हा तरुण १३ डिसेंबर २०१८ च्या पहाटे घरात लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी रामेश्वरला तपासून तो ८५ टक्के जळीत असल्याचे निदान केले. त्यामुळे त्याचा जीव वाचण्याची संधी ०.८ टक्के म्हणजे जवळजवळ शून्य असल्याची माहिती रामेश्वरच्या कुटूंबियांना देण्यात आली. रामेश्वरचा जीव वाचण्याची शक्यता धूसर झाली असतानाही सर्वोतोपरी उपचार करून त्याला जगविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्याचे डॉ. नितीन चाटे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण गोवंदे, डॉ. महेश महाजन, डॉ. वल्लभ जाने, डॉ. अमोल केंद्रे यांच्या पथकाने केले.

जळीत रुग्णांच्या उपचारांसाठी मोजक्या ठिकाणी वापरले जाणारे काही अत्याधुनिक इंजेक्शन रामेश्वरच्या ऊपचारांसाठी तातडीने व मोफत उपलब्ध करण्यात आले. रामेश्वरच्या संपूर्ण शरीरावरील जखमांची जवळपास दररोज शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करुन पट्टी बांधण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवातीच्या आठवड्यात जंतूसंसर्गाचा  मोठा धोका नव्यानेच रुग्णालयात उपलब्ध झालेल्या आधुनिक औषधींमुळे यशस्वीरित्या टाळता आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांसोबतच नर्सिंग स्टाफनेही विशेष परिश्रम घेतले.

विक्रमी कामगिरी विभागप्रमुख  डॉ. नितीन चाटे यांच्या नेतृत्वात सर्जरी विभाग नवनवीन प्रांतामध्ये विक्रमी कामगिरी करत आहे. ८५ टक्के जळीत रुग्ण बरा करण्याचा वैद्यकशास्त्रात अतिशय दुर्मिळ असलेला हा विक्रम सर्जरी विभाग व एकूणच स्वाराती रुग्णालयावर परिसरातील जनतेचा विश्वास वृद्धिंगत करणारी बाब आहे.    -डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता 

टॅग्स :docterडॉक्टरMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलAmbajogaiअंबाजोगाई