शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

रेडीरेकनरमध्ये वाढ नको; सामान्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी विकासकांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:47 IST

बांधकाम तसेच इतर क्षेत्रात मंदी असल्याने आगामी आर्थिक वर्षात रेडीरेकनर रेटमध्ये वाढ न करता सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यावासायिक आणि विकासकांच्या जिल्हा क्रेडई संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने बºयाच सवलती देऊकेल्या आहेत. त्यामुळे बाजारमूल्य दर वाढविल्यास यात मोठा अडसर ठरेल असे जिल्हा क्रेडईचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बांधकाम तसेच इतर क्षेत्रात मंदी असल्याने आगामी आर्थिक वर्षात रेडीरेकनर रेटमध्ये वाढ न करता सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यावासायिक आणि विकासकांच्या जिल्हा क्रेडई संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने बºयाच सवलती देऊकेल्या आहेत. त्यामुळे बाजारमूल्य दर वाढविल्यास यात मोठा अडसर ठरेल असे जिल्हा क्रेडईचे म्हणणे आहे.

दरवर्षी अशास्त्रीय पद्धतीने वाढणाºया रेडीरेकनर दरासंदर्भात निर्णय होऊन १ एप्रिलपासून लागू केले जातात. त्याचा सगळेच जण धसका घेतात. बाजारमूल्य दर निश्चित करताना कोणतीही शास्त्रीय कार्यपद्धती न वापरता अवाजवी दरवाढ केली जाते. हे दर ठरविण्यासाठी शासनाकडून लाभार्थींची मते मागितली जात नाहीत. त्यामुळे बाजारमूल्य तक्त्याचे दर अंतीम करण्याआधी सर्व लाभार्थी घटकांकडून सूचना मागवून विचारविनिमय करून दरवाढ करावी असे क्रेडईची मागणी आहे.

अनेक ठिकाणी बाजारमूल्य दर आवाजवी असल्याने तेथील जागेचे, फ्लॅटचे दर कमी करणे गरजेचे असल्याचे विकासकांचे मत आहे.मागील सात वर्षांतील रेडीरेकनरचा आढावा पाहता दरवर्षी रसरी २० ते ३० टक्के दर हे सर्वसामान्य विभागात वाढविण्यात येतात. त्यामुळे े रेडीरेकनरचे दर तिप्पट झालेले आहेत. उलट बाजारभावामध्ये मागील चार वर्षात अजिबात वाढ झाली नसून बाजारभाव बहुसंख्य ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी बाजारमूल्य दर हे कमी झाल्याचे दिसून येते. हा विषय सामान्य नागरिकांच्या घरांच्या गरजेशी निगडित असून महत्वाचा असल्याने शासनाने विचार करावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा क्रेडईने म्हटले आहे.रेडीरेकनरमध्ये पारदर्शकतेची गरजरेडीरेकनरच्या दरवाढीसोबत त्यासोबतच्या स्थळ टिपांमध्येही वाढ केली जाते. मागील सात वर्षात स्थळ टिपांचा वापर दर वाढविण्याठी केला जातो. यात पारदर्शकतेची गरज आहे. यात फेररचनेची गरज आहे.८ नोव्हेंबर २०१६ पासून बांधकाम क्षेत्रात मंदीची लाट आहे. त्यामुळे बीड शहरातील रिअल इस्टेटसह बांधकामांच्या व्यवहारावर मोठा परिणाम झालेला आहे. हीच परिस्थिती सर्वत्र आहे.बीडमध्ये न. प. मार्फत गुंठेवारीसाठी रेडीरेकनरच्या दराने आकारणी सुरु आहे. त्यामुळे रेडीरेकनरच्या दरात वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न दूर राहील. शासनाने विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.जीएसटीमुळे अतिरिक्त बोजाजीएसटी लागू होण्याआधी ५.३५ टक्के कर घरांवर भरावा लागत होता. आता या ग्राहकांना १२ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. तसेच जीएसटीनंतर एलबीसी बंद झालेले नाही. ग्राहकाची क्रयशक्ती वाढत नसल्याने या करांचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडत आहे. त्यात अनेक ठिकाणी मुद्रांक शुल्क दर एक टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.- वैभव क्षीरसागर