शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्वत:च्या यंत्रणेवरच अविश्वास; बीड कोविड रुग्णालय प्रमुखाचे औरंगाबादमध्ये उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:27 IST

जिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तात्काळ कोरोना तपासणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालयातीलच आयसीयू विभागात दाखल केले.अवघे काही तास त्यांनी येथे उपचार घेतल्यानंतर औरंगाबादचा रस्ता धरला.

बीड : उपचार व  सुविधांबाबत सामान्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगणारे अधिकारीच आता स्वता:च्या यंत्रणेवर अविश्वास दाखवित आहेत. कोवीड रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी अवघे काही तास जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन नंतर औरंगाबादेतील खाजगी रुग्णालय गाठले. ते रेफर झाल्यामुळे येथील उपचाराबद्दल आता खरोखरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तात्काळ कोरोना तपासणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयातीलच आयसीयू विभागात दाखल केले. अवघे काही तास त्यांनी येथे उपचार घेतल्यानंतर औरंगाबादचा रस्ता धरला. कोविड रुग्णालयाचे प्रमुख आणि इतरांना सर्व सुविधा दिल्या जातात, उपचार वेळेवर मिळतात, सामान्यांच्या तक्रारी बिनबुडाच्या आहेत, असे सांगणारे अधिकारीच आता औरंगाबादला गेले आहेत. त्यांनी सरकारी यंत्रणेवर पूर्णपणे अविश्वास दाखविला आहे. प्रकृती चिंताजनक सांगून रेफर झाले तर ते औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात का गेले नाही? खाजगी रुग्णालयात का गेले? ज्या यंत्रणेचे प्रमुख आहेत, त्याच यंत्रणेवर त्यांचा विश्वास नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या अधिकाऱ्याने स्वता: जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन सामान्यांच्या मनात सरकारी यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करून देण्याची गरज होती. परंतु त्यांनी पूर्णपणे अविश्वास दाखवित औरंगाबाद गाठल्याने सामान्यांमधून चर्चेला उधान आले आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला भ्रमणध्वणीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन नॉट रिचेबल होता.सुविधा, उपचारांबद्दल तक्रारींचा ढिगाराजिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत, वेळेवर उपचार मिळत नाहीत, जेवण दर्जेदार नाही, डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी लक्ष देत नाहीत, अशा तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. परंतु या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा दावा प्रत्येकवेळी आरोग्य विभागाकडून केला जातो. या सर्व तक्रारी खोट्या असतील किंवा त्यात तथ्य नाही तर स्वत: अधिकारी औरंगाबादला का गेले? त्यांनी बीडमध्ये का उपचार घेतले नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. 

अनेक सरकारी डॉक्टर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. एक अधिकारी औरंगाबादला गेले आहेत, हे खरे आहे. यावर आताच बोलणे उचित नाही. लवकरच यावरही प्रतिक्रिया दिली जाईल. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड