शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
6
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
7
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
8
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
9
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
10
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
11
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
12
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
13
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
14
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
15
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
16
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
17
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
18
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
19
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
20
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST

रबी हंगामात ३ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आलेला आहे. यापैकी ज्वारी पीक सर्वाधिक १ लाख ५९ ...

रबी हंगामात ३ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आलेला आहे. यापैकी ज्वारी पीक सर्वाधिक १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्याखालोखाल १ लाख ३८ हजार क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा आहे, तसेच गहू, मका या पिकांचा पेरा आहे. दरम्यान, यापैकी ज्वारी व गहू ही पिके शेतात उभी असल्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसलेला नाही. थोड्या प्रमाणात अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील काही ठिकणी मात्र, या पिकांनादेखील फटका बसला आहे, तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची काढणी झालेली असल्यामुळे त्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस, वारा व काही ठिकाणी गारा पडल्यामुळे आंबा व अंबे बहरातील फळबागांचे फळ धरणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील या अवकाळीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.

अवकाळी पावसाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे, तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील पंचनामे करण्याचा आदेश प्रशासनाला दिले आहेत.

चौकट,

रोहतवाडीत दगावल्या शेळ्या

पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील कदम नावाच्या शेतकऱ्यांच्या ५ शेळ्यांचा या अवकाळी पावसामुळे मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाकडून गावात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शेळ्या मेल्याचे कारण स्पष्ट होईल त्यानुसार प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

चौकट,

२ हजार हेक्टरवरील आंबा धोक्यात

आंबा पिकाला काही ठिकाणी मोहर लागलेला आहे, तर काही ठिकाणी फळधारणा सुरू झाली आहे. मात्र, मागील आठवड्यात वीज तोडल्यामुळे फळबागांना पाणी देता आले नाही. त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ हजार हेक्टरवरील आंबा पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे या नुकसानीचे गांभीर्य समजून प्रशासनाने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

दोन दिवस झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असेल त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश मंडळ व तलाठी स्तरावर दिले आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यावर नुकसानभरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल.

-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड

प्रतिक्रिया

बहुतांश ठिकाणी पिके उभे असल्यामुळे नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे. काही ठिकाणी काढणीपश्चात हरभरा पिकाचे नुकसान झाले असेल, तर विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा ई-मेलवर याची माहिती शेतकऱ्यांनी स्वत: द्यावी; अथवा कृषी सहायकाची मदत घ्यावी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

-डी.जी. मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड