शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जलजीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST

बीड : जलजीवन मिशनअंतर्गत कृती आराखड्यातील वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ४ मार्च रोजी घेतला. यावेळी ...

बीड : जलजीवन मिशनअंतर्गत कृती आराखड्यातील वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ४ मार्च रोजी घेतला. यावेळी या कार्यक्रमाअंतर्गत गावांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यापूर्वी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या संबंधित यंत्रणेस सूचना दिल्या. तसेच सध्या पाणीपुरवठा योजना बंद असलेल्या गावांचा अथवा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसलेल्या गावांचा समावेश होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काही गावांमधील सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे विविध कारणाने यशस्वीरित्या कार्यान्वित होणे शक्य नाहीत, त्या पाणीपुरवठा योजना त्या स्थितीत अंतिम करून पुनरूज्जीवित करण्यासाठी जिल्हा परिषदेस हस्तांतरित करता येतील असे सांगितले. पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांतील कामांचादेखील आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येकाला दरडोई किमान ५५ लिटर पाणीपुरवठा प्रतिदिन करणे हे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्याकरिता ५० टक्के निधी राज्य शासन व ५० टक्के निधी केंद्र शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील एकूण १३६७ गावांची योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने वर्गवारी करण्यात आली असून १४२ गावात किरकोळ दुरुस्तीद्वारे ९७९५ प्रस्तावित नळजोडणी करावयाची असून उर्वरित ११२४ गावांमध्ये प्रस्तावित कामांद्वारे ३ लाख ४९ हजार ४४९ नळजोडणी करण्यात येईल. या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

===Photopath===

040321\1944042_bed_13_04032021_14.jpg

===Caption===

आढावा बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप  यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व इतर विभागाचे अधिकारी दिसत आहेत.