शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

शवविच्छेदनगृहाअभावी मृतदेहांची अवहेलना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:03 IST

जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : ३६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळूनही उदासिनता

बीड : जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे समोर आले आहे. पीएचसीत सुविधा नसल्याने ग्रामीण अथवा उपजिल्हा, जिल्हा रूग्णालयाची वाट धरावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सुविधा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना इमारत नसल्याने आजारी पडत आहे. ५१ पैकी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेन गृह बनवावे, यासंदर्भात डिसेंबर २०१८ च्या आरोग्य समिती बैठकीत ठराव घेण्यात आला. त्याप्रमाणे आष्टी तालुक्यातील धामणगाव, धारूर तालुक्यातील मोहखेड व भोगलवाडी, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व नायगाव, परळी तालुक्यातील नागापूर व पोहनेर, माजलगाव तालुक्यातील सादोळा व गंगामसला येथे शवविच्छेदन गृह बनविण्याचे निश्चीत झाले. एका गृहासाठी ९ लाख रूपयांची तरतुदही करण्यात आली. जवळपास ३६ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने यावर पुढील कारवाई केलेली नाही. आठ महिने झाले तरी याचे साधे टेंडर काढून काम सुरू करण्यास बांधकाम विभाग पुढे सरसावलेला नाही. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शवविच्छेदन गृह नसल्याने मृतदेहांचीही अवहेलना होत आहे. जवळच्या ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रूग्णालयात मृतदेह शवविच्छेनासाठी नेला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामध्ये पोलीस, नातेवाईकांना वेळ लागण्यासह त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. यावर कारवाई करून कामे सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.नियम वेगळाच आणि काम वेगळेचनियमानुसार ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह आणला, तेथील डॉक्टरांनीच शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. तसे आदेश सहसंचालकांनी सर्व उपसंचालकांनाही दिलेले आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर संबंधित पीएचसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत शवविच्छेन करायला लावतात. हे नियमाने चुक आहे. तर दुसºया बाजूला पीएचसीमध्ये सुविधा नसणे, डॉक्टर मुख्यालयी न राहणे ही कारणेही आहेत.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ?अनेकदा अपघात, खून, आत्महत्यासारख्या प्रकरणात संवेदनशील परिस्थिती निर्माण होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांची अनुपस्थित राहत असल्याने येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यानंतर पुढील आरोग्य संस्थेत शवविच्छेन केले जाते.दरम्यानच्या काळात यंत्रणेला मोठा त्रास होतो. त्यामुळे शवविच्छेदन गृह तात्काळ बांधणे गरजेचे आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू