शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदनगृहाअभावी मृतदेहांची अवहेलना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:03 IST

जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : ३६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळूनही उदासिनता

बीड : जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे समोर आले आहे. पीएचसीत सुविधा नसल्याने ग्रामीण अथवा उपजिल्हा, जिल्हा रूग्णालयाची वाट धरावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सुविधा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना इमारत नसल्याने आजारी पडत आहे. ५१ पैकी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेन गृह बनवावे, यासंदर्भात डिसेंबर २०१८ च्या आरोग्य समिती बैठकीत ठराव घेण्यात आला. त्याप्रमाणे आष्टी तालुक्यातील धामणगाव, धारूर तालुक्यातील मोहखेड व भोगलवाडी, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व नायगाव, परळी तालुक्यातील नागापूर व पोहनेर, माजलगाव तालुक्यातील सादोळा व गंगामसला येथे शवविच्छेदन गृह बनविण्याचे निश्चीत झाले. एका गृहासाठी ९ लाख रूपयांची तरतुदही करण्यात आली. जवळपास ३६ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने यावर पुढील कारवाई केलेली नाही. आठ महिने झाले तरी याचे साधे टेंडर काढून काम सुरू करण्यास बांधकाम विभाग पुढे सरसावलेला नाही. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शवविच्छेदन गृह नसल्याने मृतदेहांचीही अवहेलना होत आहे. जवळच्या ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रूग्णालयात मृतदेह शवविच्छेनासाठी नेला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामध्ये पोलीस, नातेवाईकांना वेळ लागण्यासह त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. यावर कारवाई करून कामे सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.नियम वेगळाच आणि काम वेगळेचनियमानुसार ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह आणला, तेथील डॉक्टरांनीच शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. तसे आदेश सहसंचालकांनी सर्व उपसंचालकांनाही दिलेले आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर संबंधित पीएचसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत शवविच्छेन करायला लावतात. हे नियमाने चुक आहे. तर दुसºया बाजूला पीएचसीमध्ये सुविधा नसणे, डॉक्टर मुख्यालयी न राहणे ही कारणेही आहेत.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ?अनेकदा अपघात, खून, आत्महत्यासारख्या प्रकरणात संवेदनशील परिस्थिती निर्माण होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांची अनुपस्थित राहत असल्याने येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यानंतर पुढील आरोग्य संस्थेत शवविच्छेन केले जाते.दरम्यानच्या काळात यंत्रणेला मोठा त्रास होतो. त्यामुळे शवविच्छेदन गृह तात्काळ बांधणे गरजेचे आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू