शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या मागणीसाठी धर्मेवाडी ग्रामस्थांची फरफट; पंचायत समितीचे तहसील कार्यालयावर खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:51 IST

ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून मिळेना पाणी तीन वेळेस आंदोलन करूनही मिळेना पाणी 

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाईच्या ग्रासले आहे. टँकरसाठी त्यांनी प्रशासनास निवेदने देऊन मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला मात्र तरीही पाणी मिळाले नाही. यामुळे आज ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

धर्मेवाडी हे गाव दुष्काळाचा मागील दोन महिन्यांपासून सामना करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी माजलगाव पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर गावकऱ्यांनी दिनांक 1 नोव्हेंबरला तलाठी कार्यालयावर निदर्शने केली, पुन्हा 13 नोव्हेंबरला तालखेड फाटा येथे रस्ता रोको, 5 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावर प्रशासनाने 25 डिसेंबर पर्यंत टँकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. 

मात्र, अद्याप टँकर सुरू न झाल्याने आज गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी घागर, हांडे घेऊन पंचायत समिती आवारात ठिय्या मांडला. टँकर चालू केल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. यावेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , उपसभापती डॉ. वसीम मनसबदार  तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. दरम्यान पंचायत समिती सभापती अलका नरवडे गट विकास अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. आंदोलन सुरू असतानाच त्यांनी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांना या प्रश्नी चांगलेच फैलावर घेतले.

यानंतर आंदोकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. येथे आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांचाकडे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कशाप्रकारे प्रस्तावांची हेळसांड करत आहेत याचा पाढाच वाचला. आंदोलनात सुंदर चव्हाण , संतोष राठोड, महादेव सुरवसे, वैजनाथ हुंबे, विठोबा काळे, रेवणनाथ यादव, राजाभाऊ दरवेशी आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. 

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी प्रश्न बिकट आंदोलकांनी प्रथम मागणी  करताच मी प्रस्ताव तयार करून टँकर लवकर सुरू करण्याबाबत गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना सांगितले होते. मात्र, मागील दिड महिन्यांपासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती उद्भवली - अल्का जयदत्त नरवडे,सभापती, पंचायत समिती 

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनBeedबीड