शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

टँकरच्या मागणीसाठी धर्मेवाडी ग्रामस्थांची फरफट; पंचायत समितीचे तहसील कार्यालयावर खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:51 IST

ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून मिळेना पाणी तीन वेळेस आंदोलन करूनही मिळेना पाणी 

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाईच्या ग्रासले आहे. टँकरसाठी त्यांनी प्रशासनास निवेदने देऊन मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला मात्र तरीही पाणी मिळाले नाही. यामुळे आज ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

धर्मेवाडी हे गाव दुष्काळाचा मागील दोन महिन्यांपासून सामना करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी माजलगाव पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर गावकऱ्यांनी दिनांक 1 नोव्हेंबरला तलाठी कार्यालयावर निदर्शने केली, पुन्हा 13 नोव्हेंबरला तालखेड फाटा येथे रस्ता रोको, 5 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावर प्रशासनाने 25 डिसेंबर पर्यंत टँकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. 

मात्र, अद्याप टँकर सुरू न झाल्याने आज गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी घागर, हांडे घेऊन पंचायत समिती आवारात ठिय्या मांडला. टँकर चालू केल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. यावेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , उपसभापती डॉ. वसीम मनसबदार  तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. दरम्यान पंचायत समिती सभापती अलका नरवडे गट विकास अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. आंदोलन सुरू असतानाच त्यांनी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांना या प्रश्नी चांगलेच फैलावर घेतले.

यानंतर आंदोकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. येथे आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांचाकडे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कशाप्रकारे प्रस्तावांची हेळसांड करत आहेत याचा पाढाच वाचला. आंदोलनात सुंदर चव्हाण , संतोष राठोड, महादेव सुरवसे, वैजनाथ हुंबे, विठोबा काळे, रेवणनाथ यादव, राजाभाऊ दरवेशी आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. 

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी प्रश्न बिकट आंदोलकांनी प्रथम मागणी  करताच मी प्रस्ताव तयार करून टँकर लवकर सुरू करण्याबाबत गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना सांगितले होते. मात्र, मागील दिड महिन्यांपासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती उद्भवली - अल्का जयदत्त नरवडे,सभापती, पंचायत समिती 

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनBeedबीड