शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या मागणीसाठी धर्मेवाडी ग्रामस्थांची फरफट; पंचायत समितीचे तहसील कार्यालयावर खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:51 IST

ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून मिळेना पाणी तीन वेळेस आंदोलन करूनही मिळेना पाणी 

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाईच्या ग्रासले आहे. टँकरसाठी त्यांनी प्रशासनास निवेदने देऊन मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला मात्र तरीही पाणी मिळाले नाही. यामुळे आज ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

धर्मेवाडी हे गाव दुष्काळाचा मागील दोन महिन्यांपासून सामना करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी माजलगाव पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर गावकऱ्यांनी दिनांक 1 नोव्हेंबरला तलाठी कार्यालयावर निदर्शने केली, पुन्हा 13 नोव्हेंबरला तालखेड फाटा येथे रस्ता रोको, 5 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावर प्रशासनाने 25 डिसेंबर पर्यंत टँकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. 

मात्र, अद्याप टँकर सुरू न झाल्याने आज गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी घागर, हांडे घेऊन पंचायत समिती आवारात ठिय्या मांडला. टँकर चालू केल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. यावेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , उपसभापती डॉ. वसीम मनसबदार  तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. दरम्यान पंचायत समिती सभापती अलका नरवडे गट विकास अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. आंदोलन सुरू असतानाच त्यांनी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांना या प्रश्नी चांगलेच फैलावर घेतले.

यानंतर आंदोकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. येथे आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांचाकडे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कशाप्रकारे प्रस्तावांची हेळसांड करत आहेत याचा पाढाच वाचला. आंदोलनात सुंदर चव्हाण , संतोष राठोड, महादेव सुरवसे, वैजनाथ हुंबे, विठोबा काळे, रेवणनाथ यादव, राजाभाऊ दरवेशी आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. 

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी प्रश्न बिकट आंदोलकांनी प्रथम मागणी  करताच मी प्रस्ताव तयार करून टँकर लवकर सुरू करण्याबाबत गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना सांगितले होते. मात्र, मागील दिड महिन्यांपासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती उद्भवली - अल्का जयदत्त नरवडे,सभापती, पंचायत समिती 

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनBeedबीड