शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:03 IST

माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

घाटनांदूर : माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.घाटनांदूर येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री पंडीतराव दौंड, तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट, राकॉँचे परळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गोविंदराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गणेश देशमुख, सरपंच ज्ञानोबा जाधव, बाळासाहेब देशमुख , शेख मुसाशेठ, सत्यजित सिरसाट, शेख मुक्तार, काशिनाथ कातकडे, बालासाहेब डोंगरे,अ‍ॅड इंद्रजीत निळे, चंद्रकांत वाकडे, धनंजय साळुंके उपस्थित होते. धनंजय मुंडे म्हणाले, मी राजकारण,समाजकारणात अगोदर आलो मग मी विरोध कसा करणार,मला विकासाचे राजकारण करायचे आहे. मी २४ तास लोकांचे फोन उचलतो बोलतो. अडचणीला धावून जातो खऱ्या अर्थाने मीच स्व. साहेबांचा वारसा चालवित आहे. रस्ते,नाली,सभागृह करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. याला विकास म्हणत नाहीत ,रोजगार निर्माण करणारे उद्योग, सिंचन व्यवस्था, शिक्षण, व्यवसायासाठी सुविधा हे फार महत्त्वाचे असून हे सर्व निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे. डिजीटल बोर्ड लावून व फसव्या घोषणा करून विकास होत नसल्याचा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या प्रसंगी पंडीतराव दौंड,बाळासाहेब देशमुख,किशनराव बावणे, बालासाहेब राजमाने यांचे भाषण झाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे