शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

धनंजय मुंडेंना जनतेशी असलेला संवाद आला कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:20 IST

शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले.

ठळक मुद्देसहा महिने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा; दौंड यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मेहनत

परळी : शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले. परळी मतदार संघातील ग्रामीण भागातून मताधिक्क्य तर मिळालेच परंतु शहरातूूनही मताधिक्क्य मिळाल्याने धनंजय मुंडे यांचा मोठा विजय झाला.परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणात एप्रिल महिन्यापासूनच पाणीसाठा कमी झाला. अल्प पाणीसाठा असताना ५ दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करावा लागला. त्यानंतर धरण कोरडेठाक झाले व पाणी टंचाईची तीव्रता वाढली. कधी नव्हे एवढी यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई परळीत जाणवली. अशा अडचणीच्या काळात पाण्यासाठी परळीकरांची तारांबळ न होवू देता धनंजय मुंडे यांनी आपल्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली व या सुचनेचे तंतोतंत पालन झाले. प्रत्येक गल्लीत नगर परिषदेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शिवाय नाथ प्रतिष्ठानने ही या कामी मदत केली. शहरात पाणीपुरवठा करण्यात राष्ट्रवादी पुढे राहिल्याने मतदारांनीही भाजप पेक्षा राष्ट्रवादीला जास्त मते देवून पुढे नेले. पाणी पुरविणे हे पवित्र काम असल्याने नागरिकांनी धनंजय मुंडे यांना निवडणुकीत मदत केली.धनंजय मुंडे यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असल्याने व समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पाच वर्ष काम केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना यश प्राप्त करता आले. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील अनेक गावात जाहिर सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेवून संवाद साधला होता. हा संवादही धनंजय मुंडे यांच्या कामाला आला. राष्ट्रवादी काँग़्रेसच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री पंडीतराव दौंड, संजय दौंड व काँग्रेसचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जीव तोडून मेहनत घेतली. तसेच धनंजय मुंडे यांचीही विकासासाठी असलेली तळमळ पाहून मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मते टाकली. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात कामे केली. या विकास कामाचीही त्यांना मदत झाली.विजयाची तीन कारणे...1परळी नगर परिषद राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. शहरात पाणीटंचाईच्या काळात नगर परिषदेने ६ महिने पाणीपुरवठा केला.2कार्यकर्त्यांची मजबूत फळी, माजी मंत्री पंडितराव दौंड तसेच काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले.3पंतप्रधान नरेंद्र मोदी, उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा होऊनही मतांवर परिणाम झाला नाही. उलट धनंजय मुंडे यांनी स्वत: मतदार संघाची खिंड लढविली.

टॅग्स :BeedबीडResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे