शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडेंना जनतेशी असलेला संवाद आला कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:20 IST

शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले.

ठळक मुद्देसहा महिने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा; दौंड यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मेहनत

परळी : शहरात पाणी टंचाईच्या काळात धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेने ६ मिहने परळीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे परळी शहरातून १८ हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले. परळी मतदार संघातील ग्रामीण भागातून मताधिक्क्य तर मिळालेच परंतु शहरातूूनही मताधिक्क्य मिळाल्याने धनंजय मुंडे यांचा मोठा विजय झाला.परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणात एप्रिल महिन्यापासूनच पाणीसाठा कमी झाला. अल्प पाणीसाठा असताना ५ दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करावा लागला. त्यानंतर धरण कोरडेठाक झाले व पाणी टंचाईची तीव्रता वाढली. कधी नव्हे एवढी यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई परळीत जाणवली. अशा अडचणीच्या काळात पाण्यासाठी परळीकरांची तारांबळ न होवू देता धनंजय मुंडे यांनी आपल्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली व या सुचनेचे तंतोतंत पालन झाले. प्रत्येक गल्लीत नगर परिषदेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शिवाय नाथ प्रतिष्ठानने ही या कामी मदत केली. शहरात पाणीपुरवठा करण्यात राष्ट्रवादी पुढे राहिल्याने मतदारांनीही भाजप पेक्षा राष्ट्रवादीला जास्त मते देवून पुढे नेले. पाणी पुरविणे हे पवित्र काम असल्याने नागरिकांनी धनंजय मुंडे यांना निवडणुकीत मदत केली.धनंजय मुंडे यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असल्याने व समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पाच वर्ष काम केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना यश प्राप्त करता आले. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील अनेक गावात जाहिर सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेवून संवाद साधला होता. हा संवादही धनंजय मुंडे यांच्या कामाला आला. राष्ट्रवादी काँग़्रेसच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री पंडीतराव दौंड, संजय दौंड व काँग्रेसचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जीव तोडून मेहनत घेतली. तसेच धनंजय मुंडे यांचीही विकासासाठी असलेली तळमळ पाहून मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मते टाकली. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात कामे केली. या विकास कामाचीही त्यांना मदत झाली.विजयाची तीन कारणे...1परळी नगर परिषद राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. शहरात पाणीटंचाईच्या काळात नगर परिषदेने ६ महिने पाणीपुरवठा केला.2कार्यकर्त्यांची मजबूत फळी, माजी मंत्री पंडितराव दौंड तसेच काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले.3पंतप्रधान नरेंद्र मोदी, उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा होऊनही मतांवर परिणाम झाला नाही. उलट धनंजय मुंडे यांनी स्वत: मतदार संघाची खिंड लढविली.

टॅग्स :BeedबीडResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे