शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जिल्ह्याच्या विकासाला नरेगामुळे गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST

बीड : जिल्ह्यात विकासामध्ये नरेगा ही योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे या वर्षात आराखड्यानुसार अनेक कामे सुरु केली जातील, आणि ...

बीड : जिल्ह्यात विकासामध्ये नरेगा ही योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे या वर्षात आराखड्यानुसार अनेक कामे सुरु केली जातील, आणि त्या कामांना गती देखील दिली जाईल. दरम्यान या कामांच्या संदर्भात वेळोवेळी तपासणी केली जाईल, कामात गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाईदेखील होईल, अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मागील वर्षभरापासून जिल्ह्यात नरेगाची कामे ठप्प आहेत. १०३१ ग्रामपंचायतींपैकी ४७९ गावांमध्ये शून्य रुपये खर्च करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नरेगाच्या कामांना गती दिली जाईल. यात गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन गैरप्रकार उघडकीस आल्यास कठोर कारवाई केली जाईल. मात्र, गैरप्रकार होईल त्यामुळे कामेच बंद ठेवायची असे केले जाणार नाही असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले. आपण नरेगाच्या सद्यस्थितीचा अहवाल घेऊन या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या भूमिकेमुळे नरेगाची कामे ठप्प पडली होती. रेखावार यांनी चक्क ग्रामपंचायतींवर अविश्वास दाखवत अनेक कामांचे वाटप विविध विभागात करण्याचे संकेत दिले होते. तसेच नरेगामध्ये भ्रष्टाचार होतो म्हणून कामेच मंजूर न करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नूतन जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विभागानुसार आढावा घेऊन करणार सुरुवात

जिल्ह्यातील कोणत्या विभागामार्फत कामे केली जातात. तसेच त्यांच्याकडे कामांची मागणी आहे का? पूर्वी केलेल्या कामांमधील गैरप्रकारामध्ये कोणाचा संबंध आहे,याचा आढावा घेऊन पुन्हा कामे सुरु केली जाणार आहेत. तसेच शासन निर्णयाप्रमाणेच सर्व नियम योजनेसाठी लागू असतील असे जिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले.