शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग, ओरिएन्टलकडे तक्रार देऊनही मिळेना विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:45 IST

बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप : ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली नाकारला विमा

बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत कृषी विभाग व ओरिएन्टल इन्शुरन्स कपंनीकडे तक्रार करूनही यावर प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक शेतक-यांनी पुण्याच्या कार्यालयातही भेट दिली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र संताप आहे.२०१९-१९ मध्ये बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी खरीपातील विमा भरला होता. यामध्ये ४ लाख ७६ हजार ५८७ शेतक-यांनी सोयाबीन विमा भरला होता. मात्र, यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून सोयाबीन विमा नाकारला होता. विशेष म्हणजे क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’ कसे क्षेत्र आले? याबाबत शेतकरी चक्रावले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या म्हणण्यानूसार शेतकºयांनी बीडच्या कंपनीकडे आणि प्रत्येक तालुक्याला कृषी कार्यालयात सर्व पुराव्यानिशी तक्रारी केल्या. मात्र, यातील बहुतांश शेतकºयांना तक्रारी करूनही अद्याप विमा मिळालेला नाही. याबाबत आपल्याकडे सर्व पुरावे असून आणि कंपनी व कृषी विभागाकडे मागणी करूनही आपल्याला उत्तरे दिली जात नाहीत. आम्हाला विम्यापासून वंचित ठेवल्याची प्रतिक्रिया अंबाजोगाई तालुक्यातील मंगेश शिंदे नामक शेतक-याने दिली. आपण पाच ते सहा वेळा बीडच्या कृषी आणि संबंधित कंपनीच्या कार्यालयात खेटे मारल्याचेही त्यांनी सांगितले.पीक विमाप्रश्नी सुनावणीत ५० टक्के प्रकरणांचा निपटाराबीड : खरीप हंगाम तसेच फळबाग पिकविमा संदर्भात तक्रारी असलेल्या शेतकºयांची सुनावणी शनिवारी रात्री उशीरापर्यंत तहसील कार्यालयात सुरु होती. यामध्ये जवळपास १७५ तक्रारदार शेतक-यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५० टक्के शेतकºयांच्या तक्रारींचा निपटारा झाला आहे.यावेळी बीडचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, तहसीलदार अविनाश शिंगटे, शेतकरी प्रतिनिधी दत्ता जाधव, शिवराम घोडके यांच्यासह सीएससी सेंटर चे प्रतिनिधी व ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी, बजाज, आॅल इंडिया इन्श्युरन्स यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारदार शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक शेतक-यांची तक्रार समजुन संबंधितांची मते घेऊन तात्काळ निपटारा करण्यात आला. सर्व्हे नंबरच्या ऐवजी बॅँक खाते नंबर असणे, बँकेचे खाते क्रमांक चुकणे, तसेच आधार लिंक नसणे यासारख्या तक्रारी शेतक-यांच्या होत्या. यासंदर्भात कंपनीकडे असलेली माहिती तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी पडताळून पाहिली व तक्रारीवर तोडगा काढला. तसेच १७५ शेतक-यांपैकी जवळपास ९० ते ९५ शेतकºयांचा प्रश्न सुटला असून त्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दुसºया टप्प्यातील सुनावणी देखील या आठवड्यात घेण्यात येणार असून यामध्ये उर्वरीत शेतक-यांची तक्रार निवारण केली जाईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा