शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग, ओरिएन्टलकडे तक्रार देऊनही मिळेना विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:45 IST

बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप : ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली नाकारला विमा

बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत कृषी विभाग व ओरिएन्टल इन्शुरन्स कपंनीकडे तक्रार करूनही यावर प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक शेतक-यांनी पुण्याच्या कार्यालयातही भेट दिली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र संताप आहे.२०१९-१९ मध्ये बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी खरीपातील विमा भरला होता. यामध्ये ४ लाख ७६ हजार ५८७ शेतक-यांनी सोयाबीन विमा भरला होता. मात्र, यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून सोयाबीन विमा नाकारला होता. विशेष म्हणजे क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’ कसे क्षेत्र आले? याबाबत शेतकरी चक्रावले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या म्हणण्यानूसार शेतकºयांनी बीडच्या कंपनीकडे आणि प्रत्येक तालुक्याला कृषी कार्यालयात सर्व पुराव्यानिशी तक्रारी केल्या. मात्र, यातील बहुतांश शेतकºयांना तक्रारी करूनही अद्याप विमा मिळालेला नाही. याबाबत आपल्याकडे सर्व पुरावे असून आणि कंपनी व कृषी विभागाकडे मागणी करूनही आपल्याला उत्तरे दिली जात नाहीत. आम्हाला विम्यापासून वंचित ठेवल्याची प्रतिक्रिया अंबाजोगाई तालुक्यातील मंगेश शिंदे नामक शेतक-याने दिली. आपण पाच ते सहा वेळा बीडच्या कृषी आणि संबंधित कंपनीच्या कार्यालयात खेटे मारल्याचेही त्यांनी सांगितले.पीक विमाप्रश्नी सुनावणीत ५० टक्के प्रकरणांचा निपटाराबीड : खरीप हंगाम तसेच फळबाग पिकविमा संदर्भात तक्रारी असलेल्या शेतकºयांची सुनावणी शनिवारी रात्री उशीरापर्यंत तहसील कार्यालयात सुरु होती. यामध्ये जवळपास १७५ तक्रारदार शेतक-यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५० टक्के शेतकºयांच्या तक्रारींचा निपटारा झाला आहे.यावेळी बीडचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, तहसीलदार अविनाश शिंगटे, शेतकरी प्रतिनिधी दत्ता जाधव, शिवराम घोडके यांच्यासह सीएससी सेंटर चे प्रतिनिधी व ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी, बजाज, आॅल इंडिया इन्श्युरन्स यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारदार शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक शेतक-यांची तक्रार समजुन संबंधितांची मते घेऊन तात्काळ निपटारा करण्यात आला. सर्व्हे नंबरच्या ऐवजी बॅँक खाते नंबर असणे, बँकेचे खाते क्रमांक चुकणे, तसेच आधार लिंक नसणे यासारख्या तक्रारी शेतक-यांच्या होत्या. यासंदर्भात कंपनीकडे असलेली माहिती तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी पडताळून पाहिली व तक्रारीवर तोडगा काढला. तसेच १७५ शेतक-यांपैकी जवळपास ९० ते ९५ शेतकºयांचा प्रश्न सुटला असून त्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दुसºया टप्प्यातील सुनावणी देखील या आठवड्यात घेण्यात येणार असून यामध्ये उर्वरीत शेतक-यांची तक्रार निवारण केली जाईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा