शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:46 IST

गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले.

बीड : गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले. भरतबुवांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, दोन भाऊ, भावजई आदी परिवार आहे.वारकरी सांप्रदायाची पताका गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे सांभाळणाऱ्या भरतबुवांनी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. मागील सोळा वर्षापासून ते या महोत्सवाचे उत्कृष्ट संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायीक चळवळीची मोठी हानी झाली आहे.संत चरित्राचे गाढे अभ्यासक असलेले रामदासी यांना शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करु न त्यांना मृत घोषित केले. भरतबुवांच्या अकाली निधनाची वार्ता वाºयासारखी शहरभर पसरली अनेकांना त्यांच्या निधनाने धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व क्षेत्रातील नागरिकांनी, प्रतिष्ठितांनी गर्दी केली होती. भरतबुवा रामदासी हे मुळचे रुई धानोरा (ता.गेवराई) येथील रहिवासी असून बीड शहरातील सराफा रोडवरील राममंदिर गल्लीत ते वास्तव्यास होते. गेल्या चाळीस वर्षापासून देशभरात सांप्रदायिक, वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा केली आहे. बीडचे नाव सांप्रदायिक चळवळीच्या माध्यमातून देशाच्या पटलावर पोहचवण्यात भरतबुवांचा सिंहाचा वाटा होता.रविवारी सकाळी अंत्यसंस्कारभरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर १ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सराफा लाईन, राम मंदिर गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.लोकमत आॅनलाईनचे भरतबुवा लिहायचे अध्यात्मलोकमत आॅनलाईनवर हभप भारतबुवा रामदासी हे नियमित आठवड्याला अध्यात्म या सदरातून समाजप्रबोधन करत असत. अतीशय स्पष्ट, सुलभ भाषेत दाखले देत ते अंधश्रद्धा, वाईट गोष्टीवर घणाघाती लिहित असत. त्यांनी लोकमत आॅनलाईनवर ५५ लेख लिहिले. शेवटचा लेख २२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. ते नेहमी दोन लेख अ‍ॅडव्हान्समध्ये देत असत. यावेळी मात्र त्यांनी २२ फेब्रुवारीपर्यंतचाच लेख दिला. त्यांचे लिखाण असो की कीर्तन, प्रवचन, त्यास वाचकवर्ग, श्रोतावर्ग होता. लिखाण आणि वाणीवर त्यांचे प्रभूत्व होते.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू