शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:47 IST

देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

बीड : नरेंद्र मोदींचानोटबंदीचा निर्णय फसला आहे. नोटबंदीचा निर्णय जर चुकला तर मला चौकात उभे करून हवी ती शिक्षा द्या असे सांगितले होते, आता देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

माझे ठोकताळे खरे ठरतात त्यानुसार नरेंद्र मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले. पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी बीड येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

नोटबंदीला पहिला विरोध मी केला मी अनेक दिवसांपासून नोटबंदी विरोधात बोलत आहे. नोटबंदी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विरोध करणारा मी एकमेव नेता होतो. आणि आरबीआय मधील नोटा जमा झाल्यानंतर, नोटबंधीचा निर्णय फसली हे स्पष्ट आहे, आता मोदी कोणत्या चौकात येणार आहेत, तुम्ही आमच्या चौकत येता की बाजूच्या हे देशाने मोदींना विचारले पाहिजे. 

एकत्र निवडणुका कशासाठी एव्हीएमच्या तसेच एकत्र निवडणुकांच्या विषयावर देखील राज ठाकरेंनी टीका केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ' एकत्र कशासाठी, तुमचे होऊ घातलेले पराभव झाकण्यासाठीच का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला, उद्या पुन्हा कोठे त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तर काय करणार, पुन्हा निवडणूक घेत राहणार का ? तुमचे पराभव झाकण्यासाठी देश निवडणुकीच्या रांगेत उभा करणार का ? असे ही ते यावेळी म्हणाले. 

मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात इव्हीएमद्वारे निवडणूक पद्धत साऱ्या जगाने रद्द केली त्याचा हट्ट कशासाठी ? तुम्ही काय साधणार आहात ?  असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. इव्हीएमचे प्रताप साऱ्या देशाने पाहिले असून आता जुन्या पद्धतीने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची त्यांनी मागणी केली. 

इव्हीएममुळे भाजप विजयी मतदान यंत्रे सत्ताधाऱ्यांच्या हाती असतील तर निवडणूक लढवायच्या कशासाठी असेही ठाकरे म्हणाले. ईव्हीएम सत्ताधाऱ्यांच्या हातात पुढील निवडणुका पटपत्रिकेवर घेण्यात याव्यात यासाठी सर्व पक्षाने एकत्र आले पाहिजे, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे, ईव्हीएम मुळेच भाजपचे उमेदवार निवडून येतात अशी टीका ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरणNote Banनोटाबंदी