शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

मताधिकार वापरला तरच लोकशाही भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:18 IST

नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. ते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमास जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्राचार्य भालचंद्र कराड, आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले, लोकशाहीच्या मजबुती करणासाठी मतदाराची भूमिका बजावतांना प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी ओळखावी असे सांगून मतदानाचे महत्व स्पष्ट केले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच निवडणूक आयोगाने सोशल मिडियाचा मोठया प्रमाणात वापर करुन विविध माध्यमातून माहिती उपलब्ध करुन दिली आहे त्याचा उपयोग नागरिकांनी व मतदारांनी करावा. येणाऱ्या निवडणुकीत मतदानामध्ये पारदर्शकता यावी यासाठी व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार आहे याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. १८ वर्ष पुर्ण झालेल्या प्रत्येक युवक, युवतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी व मतदानाचा हक्क बजवावा, असेही ते यावेळी म्हणाले.मतदार जागृतीसाठी काढली रॅलीजिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर,तहसिलदार अविनाश शिंगटे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये बीड येथील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, अधिका-यांचा सहभाग नोंदविला.

टॅग्स :Electionनिवडणूकgovernment schemeसरकारी योजनाSocialसामाजिक