शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजप-सेनेच्या युतीवर दानवेंची चुप्पी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:33 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते.

ठळक मुद्देआज सर्व रोग निदान शिबीर : आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी न केल्यास कारवाई

जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या युतीच्या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे प्रथमच जालना दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान या आरोग्य योजनेच्या कार्ड वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी आपल्या मनोगातात त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची जंत्री वाजवली खरी, परंतु शिवसेनेचा नामोल्लेख न करता युतीवरही भाष्य केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.येथील श्रीकृष्णनगरमध्ये हा कार्ड वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, आ. नारायण कुचे, भास्कर दानवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, सिध्दिविनायक मुळे, किशोर अग्रवाल, अशोक पांगारकर, धनराज काबलिये आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. भास्कर दानवे यांनी प्रास्ताविकातून आयुष्यमान योजनेतून कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला पाच लाख रूपया पर्यंतची मदत मिळणार असल्याचे सांगितले.यावेळी अनिरूध्द खोतकर, आ. कुचे यांनी विचार व्यक्त केले. पुढे बोलताना खा. रावसाहेब दानवे यांनी सांगिले की, केंद्र सरकारने उज्वला, जनधन तसेच आयुष्यमान योजना राबवून गरीबांना मदत करण्याचे कार्य केले आहे. एकूणच गेल्या चार वर्षात पंतप्रधान मोदी यांनी श्रीमंत आणि गरीबांतील दरी संपविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचे दानवे म्हणाले. युती झाल्यावर ते पहिल्यांदाच जालन्यात आल्याने त्यांच्याकडून काही राजकीय ऐकायला मिळते काय या विचारात सर्वजण होते, परंतु त्यांनी ते टाळून महागठबंधनवर हल्ला चढवून आमच्यावर जातीयवादी असल्याचा जे आरोप करत आहेत, त्यात तथ्य नसल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुलोदमध्ये असताना कोणाशी संधान साधून सत्ता चालवली होती, हे त्यांनी आठवून पाहावे असे सांगण्यास दानवे विसरले नाहीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.भाजप सोबतच शिवसेनचाही उल्लेख करागेल्या चारवर्षापासून शिवसेना आणि भाजपमध्ये सरकारमध्ये राहूनही दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांच्या घोषणाही बदल्या आहेत, असे सांगून आता आपण युतीने लढणार आहोत. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांकडून केवळ भाजपचा जय जयजयकार केला जात होता, त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, आता भाजप आणि शिवसेनेचा विजय असो, असा उल्लेख करण्याचे आवाहन त्यांनी केल्यावर एकच हशा पिकला. याचे कारण सांगताना अनेक योजना या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संमतीनेही तयार झाल्याचे अंबेकर म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv Senaशिवसेना