शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचा पंचनामा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:12 IST

जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पावसाअभावी कडधान्य, सोयाबीन पिकांचे नुकसान

बीड : जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, कडधान्य ही मुख्य पिके आहेत. यामध्ये सोयबीन - २ लाख १७ हजार हेक्टर, कडधान्य - ५५ हजार हेक्टर, तर कापूस -३ लाख ७७ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन वर्र्षांपासून सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती देखील बिघडली आहे. त्याचबरोबर डोळ््यांदेखत पिकांचे होत असलेले नुकसान पाहून मानसिकता देखील खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शेतकºयांनी केली आहे.तसेच त्याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करुन नुकसनाभरपाई द्यावी तरच शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार रास्तारोकोस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकºयांना दुष्काळ जाहीर करुन एकरी १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच बेरोजगार युवकांना अण्णासाहेब पाटील व इतर योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात यावे, विजबील सरसकट माफ करण्यात यावे, शेतकºयांना पिकविमा रोखून न ठेवता तात्काळ वाटप करावा, जिल्ह्यातील शेतकºयांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करुन एसटी बसचे पास मोफत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात निर्णय न झाल्यास शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परळी-बीड मार्गावर रास्तारोको करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संखटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, लहू गायकवाड, प्रमोद पांचाळ, मधुकर पांडे, चंद्रकांत अंबाड, परमेश्वर बीर, कमलाकर लांडे, गोवर्धन दुबारे सह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीdroughtदुष्काळ