शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

पिकांचा पंचनामा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:12 IST

जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पावसाअभावी कडधान्य, सोयाबीन पिकांचे नुकसान

बीड : जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, कडधान्य ही मुख्य पिके आहेत. यामध्ये सोयबीन - २ लाख १७ हजार हेक्टर, कडधान्य - ५५ हजार हेक्टर, तर कापूस -३ लाख ७७ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन वर्र्षांपासून सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती देखील बिघडली आहे. त्याचबरोबर डोळ््यांदेखत पिकांचे होत असलेले नुकसान पाहून मानसिकता देखील खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शेतकºयांनी केली आहे.तसेच त्याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करुन नुकसनाभरपाई द्यावी तरच शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार रास्तारोकोस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकºयांना दुष्काळ जाहीर करुन एकरी १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच बेरोजगार युवकांना अण्णासाहेब पाटील व इतर योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात यावे, विजबील सरसकट माफ करण्यात यावे, शेतकºयांना पिकविमा रोखून न ठेवता तात्काळ वाटप करावा, जिल्ह्यातील शेतकºयांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करुन एसटी बसचे पास मोफत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात निर्णय न झाल्यास शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परळी-बीड मार्गावर रास्तारोको करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संखटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, लहू गायकवाड, प्रमोद पांचाळ, मधुकर पांडे, चंद्रकांत अंबाड, परमेश्वर बीर, कमलाकर लांडे, गोवर्धन दुबारे सह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीdroughtदुष्काळ