शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचा पंचनामा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:12 IST

जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पावसाअभावी कडधान्य, सोयाबीन पिकांचे नुकसान

बीड : जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघणे मुश्किल आहे. त्यामुळे तात्काळ पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, कडधान्य ही मुख्य पिके आहेत. यामध्ये सोयबीन - २ लाख १७ हजार हेक्टर, कडधान्य - ५५ हजार हेक्टर, तर कापूस -३ लाख ७७ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन वर्र्षांपासून सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती देखील बिघडली आहे. त्याचबरोबर डोळ््यांदेखत पिकांचे होत असलेले नुकसान पाहून मानसिकता देखील खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व शेतकºयांनी केली आहे.तसेच त्याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करुन नुकसनाभरपाई द्यावी तरच शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार रास्तारोकोस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकºयांना दुष्काळ जाहीर करुन एकरी १ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच बेरोजगार युवकांना अण्णासाहेब पाटील व इतर योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात यावे, विजबील सरसकट माफ करण्यात यावे, शेतकºयांना पिकविमा रोखून न ठेवता तात्काळ वाटप करावा, जिल्ह्यातील शेतकºयांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करुन एसटी बसचे पास मोफत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात निर्णय न झाल्यास शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परळी-बीड मार्गावर रास्तारोको करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संखटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, लहू गायकवाड, प्रमोद पांचाळ, मधुकर पांडे, चंद्रकांत अंबाड, परमेश्वर बीर, कमलाकर लांडे, गोवर्धन दुबारे सह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीdroughtदुष्काळ