शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

नुकसानीपोटी ५१५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:55 IST

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ ...

ठळक मुद्देबीड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर बाधीत

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, यासाठी ५१४ कोटी ८० लक्ष ५४ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शासनाकडे पाठविला आहे.जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांमधून नुकसानभरपाई तात्काळ मिळावी, अशी माागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते. या अनुषंगाने प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकºयांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधी यांची तालुकानिहाय माहिती यासोबत सादर करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतकºयांना अतिवृष्टीचा फटका बसला असून पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक हातातून गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कमीत कमी वेळेत पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत. त्याबद्दल त्यांच्या कामाचे कैतूक सर्वत्र होत आहे.तालुकानिहाय मिळणारअशी नुकसान भरपाईगेवराई तालुक्यातील १ लाख ३६ हजार५२१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १२८५१० शेतकºयांसाठी ७९ कोटी ७७ लक्ष ५५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील १ लाख ३४ हजार ३२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १३०९१८ शेतकºयांसाठी ८४ कोटी ७६ लक्ष २० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. केज तालुक्यातील १ लाख ०५ हजार २१६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १०१०१८ शेतकºयांसाठी ६७ कोटी ३१ लक्ष २५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. आष्टी तालुक्यातील १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ७४५४५ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. माजलगाव तालुक्यातील ७६ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६९०६६ शेतकºयांसाठी ४६ कोटी २६ लक्ष ६५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ७७ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ४७ कोटी ५६ लक्ष ३९ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. पाटोदा तालुक्यातील ६६ हजार ४५४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७१६२ शेतकºयांसाठी ३३ कोटी ३९ लक्ष ९५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. परळी तालुक्यातील ६१ हजार १०१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ३८ कोटी २८ लक्ष ३३ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. शिरूर कासार तालुक्यातील ५४ हजार ५७६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७३१३ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८८ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. धारूर तालुक्यातील ४६ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ४५७६९ शेतकºयांसाठी २७ कोटी ३९ लक्ष २४ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. वडवणी तालुक्यातील ३३ हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ३२३३१ शेतकºयांसाठी १९ कोटी ४२ लक्ष २१ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र