शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

नुकसानीपोटी ५१५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:55 IST

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ ...

ठळक मुद्देबीड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर बाधीत

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे कृषी पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७ लाख ५६ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, यासाठी ५१४ कोटी ८० लक्ष ५४ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शासनाकडे पाठविला आहे.जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांमधून नुकसानभरपाई तात्काळ मिळावी, अशी माागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते. या अनुषंगाने प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकºयांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधी यांची तालुकानिहाय माहिती यासोबत सादर करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतकºयांना अतिवृष्टीचा फटका बसला असून पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक हातातून गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कमीत कमी वेळेत पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत. त्याबद्दल त्यांच्या कामाचे कैतूक सर्वत्र होत आहे.तालुकानिहाय मिळणारअशी नुकसान भरपाईगेवराई तालुक्यातील १ लाख ३६ हजार५२१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १२८५१० शेतकºयांसाठी ७९ कोटी ७७ लक्ष ५५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील १ लाख ३४ हजार ३२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १३०९१८ शेतकºयांसाठी ८४ कोटी ७६ लक्ष २० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. केज तालुक्यातील १ लाख ०५ हजार २१६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या १०१०१८ शेतकºयांसाठी ६७ कोटी ३१ लक्ष २५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. आष्टी तालुक्यातील १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ७४५४५ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८० हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. माजलगाव तालुक्यातील ७६ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६९०६६ शेतकºयांसाठी ४६ कोटी २६ लक्ष ६५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ७७ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ४७ कोटी ५६ लक्ष ३९ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. पाटोदा तालुक्यातील ६६ हजार ४५४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७१६२ शेतकºयांसाठी ३३ कोटी ३९ लक्ष ९५ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. परळी तालुक्यातील ६१ हजार १०१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ६८२४८ शेतकºयांसाठी ३८ कोटी २८ लक्ष ३३ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. शिरूर कासार तालुक्यातील ५४ हजार ५७६ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ५७३१३ शेतकºयांसाठी ३८ कोटी १८ लक्ष ८८ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. धारूर तालुक्यातील ४६ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ४५७६९ शेतकºयांसाठी २७ कोटी ३९ लक्ष २४ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. वडवणी तालुक्यातील ३३ हजार ५७१ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या ३२३३१ शेतकºयांसाठी १९ कोटी ४२ लक्ष २१ हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र